*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
मुंबई:* राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने त्यांच्या अखत्यारित येणार्या सर्व शासकीय रुग्णालये व उपक्रमांसाठी दिवसातून दोन वेळेला बाह्यरुग्ण विभागाचे कामकाज सक्तीचे केले आहे. यामुळे रुग्णांना आता सकाळी व सायंकाळी अशा दोन वेळेमध्ये आरोग्य निदान व सुविधांचा लाभ घेता येणार आहे. याविषयी आरोग्य सेवेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आदेश जारी केले असून, त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी लागणार आहे.
राज्य शासनाचा हा नवा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त असलेल्या सर्व शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, विविध शासकीय दवाखाने, प्राथमिक आरोग्य पथके आणि आरोग्यवर्धिनी केंद्रे यामधील बाह्यरुग्ण विभागासाठी लागू राहील. यानुसार संबंधित ठिकाणी सकाळी ८.३० ते १२.३० व सायंकाळी ४.०० ते ६.०० या वेळेत बाह्यरुग्ण विभाग कार्यरत राहणार आहे. या निर्णयानुसार दुपारच्या वेळी १.०० ते ४.०० या कालावधीत योगा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित रुग्णालय प्रमुखांवर आहे. तसेच सोमवारी आणि शनिवारी सार्वजनिक सुट्टी आली, तरीही बाह्यरुग्ण विभाग सुरूच राहणार आहे.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा हा निर्णय रुग्णसेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण संबंधित रुग्णालयांमध्ये सकाळी ओपीडी संपल्यानंतर दवाखान्यामध्ये बंदसद़ृश्य वातावरणाचा अनुभव येत होता. शिवाय, दुपारी येणार्या रुग्णांवर रुग्णांच्या रक्त, लघवी व अन्य नमुन्यांच्या चाचण्या खासगी प्रयोगशाळेतून करून घ्याव्या लागत होत्या. हा निर्णय ग्रामीण जनतेसाठी दिलासादायक आहे.
*सौजन्य*
*कोकण न्यूज*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा