*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
अवघा रंग एक झाला
रंगी रंगला श्रीरंग
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी सर्व संतांच्या पालख्यांनी पंढरीकडे प्रस्थान केलेले आहे. सर्व लहानथोरांपासून आबालवृद्धांपर्यंत मोठ्या भक्तीभावाने वारकरी पंढरपूरला पायी जात असतात. याचेच निमित्त साधून रावबहाद्दूर गट शाळेत पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विठ्ठल -रुक्मिणी, संत तुकाराम, वासुदेव, वारकरी यांचे पोशाख परिधान केले होते.
पालखीचे पूजन उपसरपंच सौ वर्षाताई मदने व दिपाली लोखंडे यांच्या उपस्थितीत केले. बाल वारकऱ्यांची दिंडी विठूरायाचा नाम घोष करत संपूर्ण परिसरातून पुढे जात असताना लोकांनी उत्स्फूर्तपणे विठ्ठल रुक्मिणी यांच पूजन करून ओवाळले. शाळेच्या क्रीडांगणावर रिंगण सोहळा पार पडला आणि मान्यवरांच्या हस्ते पूजा व आरती घेण्यात आली. दरम्यान सर्व महिलांनी फुगडी या पारंपारिक खेळाचा आनंद घेतला.सर्व बाल वारकऱ्यांनी भजन, अभंग, गवळणी म्हणत आणि नाचत खेळत हाती पताकाध्वज, तुळशी वृंदावन घेऊन कपाळाला टिळा लावून मुखात 'ज्ञानोबा- तुकाराम' चा जयघोष करत शाळेचा परिसर दुमदुमून टाकला. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आशा भजनावळे, रोहिणी बंडलकर, रतन लोखंडे, कोमल रणदिवे, सुशीला शिंदे, मथुरा कांबळे, शहनाज नदाफ, कार्तिकी जाधव, गौरी जाधव, सचिन बंडलकर ,मरीबा लोखंडे, अंगणवाडी सेविका सारिका चव्हाण असे सर्व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजमीर फकीर सर यांनी केले तर आभार . श्रीकांत राऊत सर यांनी मानले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा