पाणीच पाणी
संकट हे कसलं आस्मानी
रानात पाणी डोळ्यात पाणी
काळजाचं झालं पाणी पाणी !
पिकासह माती गेली वाहून
कापणीला आलेली पिकं अंकुरली अन् गेली नासून !
जीवघेणा ओला हा दुष्काळ
नासाडी केली धन धान्याची
शेतकऱ्यांसाठी झाला काळ !
कसे पावसाने मांडले थैमान
संकटाने या कोसळला बळीराजा
धोक्यात आहेत त्याचे प्राण !
झाले आता कठीण जगणं
तुटपुंजी मदत नको कोरा करा सातबारा हेच त्याचं मागणं !!
नूरजहाँ फकृद्दिन शेख
गणेशगाव ता. माळशिरस





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा