उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मंत्री तोंडी आश्वासन देत आहेत की “सरसकट पंचनामे केले जातील”, प्रत्यक्षात मात्र पंचनामा करताना अधिकारी फक्त विशिष्ट पिकांचेच पंचनामे करीत असल्याची नाराजी शेतकऱ्यांत आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की अतिवृष्टीने नुकसान हे केवळ एका-दोन पिकांचे होत नाही, तर संपूर्ण शिवाराचे होते. त्यामुळे पंचनामे निवडक न करता सरसकट व्हावेत, अशी मागणी शेतकरी करत आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा