डॉ. सलीम सिकंदर शेख*
बैतुशशिफा मल्टिस्पेसिलिटी हॉस्पिटल.
मिल्लतनगर
श्रीरामपूर
मोबाईल :- 9271640014
" हे बांधवांनों ! तुमच्यावर( साठी ) रोजा ( उपवास ) रोजे विहित - अनिवार्य (फर्ज) करण्यात आलेले आहेत , ज्याप्रमाणे तुमच्या पुर्वीच्या होऊन गेलेल्या पैगंबरांच्या काळाच्या अनुयायांना ही( विहित )अनिवार्य (फर्ज ) करण्यात आले होतें . हें याचसाठी की, तुम्हीं सदाचरणी बनावे ( व्हावे ). अपेक्षा आहे की, याद्वारे तुमच्यामधे अल्लाहा (परमेश्वर) चे भय बाळगण्याचे गुण निर्माण होईल., ( पवित्र कुर'आन सुरहा नं. 02, आ. नं. 182 ) :,# :, उपवासाचे काही ठराविक दिवसांचे रोजे आहेत , जर यदाकदाचित तुमच्यापैकी कोणी आजारी असेल अथवा प्रवासात असेल तर , त्याने ईतर दिवसांत त्यांनी राहून ( सुटलेल्या ) गेलेल्या रोजाची संख्या पुर्ण करावी . आणि ज्यांना उपवास करताना अतिशय कठीण प्रयास -त्रास कष्ट करावे लागत असतील तर , त्यांनी त्या एका उपवासाच्या बदल्यात एका गरीब माणसाला जेवन द्यावे. आणि जो कोणी आवश्यकतेपेक्षा हीं जास्त चांगलं कार्य करेल , तर ते कार्य अधिक च चांगलेच आहेत. परंतु तुम्हीं स्वतः उपवास कराच , ते तुमच्या साठी अधिक चांगलेच आहेत. ( पवित्र कुरआन सूरहा नं. 2,आ. नं. 184 ) अल्लाहा तुमच्याशी सौम्य व्यवहार करु इच्छितो , कठोरपणे व्यवहार करू इच्छित नाही. म्हणुन तुम्हाला अशी पध्दती दाखवली जात आहे की, त्यामुळे रोजा पुर्ण करावेत आणि पवित्र कुर आन रमजान महिन्यात अवतीर्ण( उतरण्यात ) तुमच्याच मार्गदर्शना(कुरआन) साठी तुम्हाला गौरविण्यात साठीच आले आहेत.अल्लाह ( परमेश्वर ) तुम्हाला सन्मार्ग दाखवण्यासाठी पवित्र कुर आन मार्गदर्शन साठी पाठवला आहेत म्हणून त्याबद्दल अल्लाहाच्या महिन्यांची अभिव्यक्ती स्विकार करा, त्याची स्तुती करा व अल्लाह ( परमेश्वर ) कृतज्ञ राहा. ( पवित्र कुरआन - पारा १, सुरहा नं .२,आ.१८५ ).
" सौम्य " या अरबी शब्दावरून " रोजा" - उपवास - हा अर्थ. त्यासाठी सकाळी ५ :०० वाजता भोर पहाटेपासून ते सुर्यास्तापर्यंत (संध्याकाळी ६:४८ पर्यंत) अन्न व पाणी एकदम( वर्ज्य) बंद . पिण्याच्या व खाण्याच्या सर्व गोष्टी बंद. दिवसभर वाईट कृत्ये, विचारांपासून विभक्त राहुन अल्लाहा (परमेश्वर) ची उपासना -आराधना -चिंतन - मनन करून, उपाशी राहणं .
पहाटेच्या ४-० वाजता उठून, कष्टाच्या "हलाल" कमाईच्या पैशांनी आणलेल्या अन्न सकाळी रोजा साठी" सेहरी" करून(खाण्याच्या विधीला अरबी शब्दाला '"सेहरी " म्हणतात. ). सेहरी करणं फार गरजेचे आहे, वैद्यकीय दृष्टिकोनातून सकाळी नाश्ता करणं आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. सुबह राजा ( बादशाह ) जैसा नाश्ता करणा, दुपहर आम आदमी जैसा खाना खाने का और रात में गरीबी जैसा डिनर करणा, जी म्हण प्रसिद्ध आहेत. असो.
वैद्यकीय भाषेत दिवसभर शरीराला पोषक आहार घेणे आवश्यक असते.
ज्यांना मधुमेह - रक्तदाब - हृदयविकार - थाईराईड - इत्यादी आजार आहे त्यांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच दैनंदिन औषधे सकाळी घेऊन व मधुमेहीं रोजा रूग्णांनी आपल्या इन्सुलिन च्या डोस( मात्रा ) रोजच्याप्रमाणे मोठा डोस न घेता थोडा कमी प्रमाणात घ्यावं. कारण काही काही मधुमेहीं रोजा ठेवणाऱ्या रूग्णांना दिवसातून तीन वेळा इन्सुलिन चे डोसेस घेणे गरजेचे असते अशा मधुमेह रूग्णांनी रोजा फार काळजी पुर्वक करावेत. जे आजारपणामुळे अशक्त झालेले असेल, आशा बंधु - भगीनींनी रोजे फार काळजी पूर्वकच करावेत, जरी इच्छा असेल तर शक्यतो नियोजन करावे. उत्साहाच्या भरात किंवा कोणाच्याही चुकीच्या सल्ल्यानुसार निर्णय घेऊ नये, व्यवस्थितरित्या आपल्या डॉक्टर व घरातील मंडळींबरोबर चर्चा -सल्ला मसलत करूनच शक्यतो निर्णय घेणं आवश्यक आहे. अल्लाह ( परमेश्वर ) नें सवलत दिलेली आहेत.
इस्लाम मधे कोणत्याही गोष्टीसाठी अतिरेकी भुमिका बिलकुल नसती व नाहीतच. प्रत्येक गोष्टीचे पर्याय उपलब्ध आहेत. चांगले व योग्य पर्याय उपलब्ध आहेत. कोणत्याही प्रकारचे आरोग्याला नुकसान होईल अशी कोणतीही अतिरेकी भुमिका बिलकुल नाही व नव्हती व नाहीत सुद्धा. हे लक्षात घेण्याची गरज आहे. आरोग्याच्या दृष्टीने व्यवस्थित राहील असा आहार घेऊनच सेहरी घेऊन ( उपवास )रोजा ला सुरूवात केली तर स्वतःबरोबर घरातील इतर सदस्य देखील आनंदाने रोजा चा आनंद घेऊ शकतील असो.
रोजा ठेवणाऱ्या च्या अंतर्मनातील इच्छानुसार "रोजा" उपवासाची तयारी करणं फारच महत्वाचं असतं.
हजरत अबू हु्रेरा रजि. सांगतात की," आम्हाला पैगंबर मुहम्मद स. नीं सांगितलं की,सेहरी खाना सबाब ( पुण्य ) आहेत. ".
सेहरी न करता दिवसभर उपाशीपोटी राहणे यामुळे रोजा चे पुन्य (सबाब) शुन्य टक्केच राहील.
रोजा साठी खालीलप्रमाणे गोष्टींची नियमावली पाळावी लागेल,
फक्त उपाशीपोटी म्हणजे रोजा ठेवणं नव्हे ,अल्लाहा (ईश्वरा) च्या आदेशानुसार ज्या वाईट भावना - प्रवृत्ती- सवयी ,आचार-विचार, मनातील वाईट सवयीं, साठवून ठेवलेले द्वेष - मत्सर - कटुता - अश्लिल विचार - अश्लिल चाळे करत आसाल तर ते सोडुन देणे, अश्लिल फोटो-व्हिडिओज,- पोस्टर्स, हें बघणे सर्व सोडून देणं. त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्ती समाजाला त्रास होईल आशा कृत्य - सवयी- विचार सोडून देणं, आपल्याकडून कोणालाही किंचितही त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेणे. एवढी मनाची पुर्ण तयारी करून ,दिवसभर उपासना ने राहणं म्हणजे ,ईच्छा- शक्तिवर - संयमावर किती परीक्षा दिली असं वाटतं.
पैगंबर मुहम्मद स्व. म्हणतात की," कयामत (प्रलयंकाळ)च्या दिवशी जन्नतुल फिरदौस (स्वर्ग) मध्ये एक "रययान"नावाचे प्रवेश द्वार आहेत, त्या प्रवेशद्वारातून फक्त रोजा( पवास )करणाऱ्यांचेच ( स्वागत केले) प्रवेश दिले जाईल (हादिस :- सहीह बुखारी .नं.१८९६ ).
जगात प्रत्येक शहरात -खेड्यात - कुठे ना कुठे काही परिस्थिती उद्भवत असते, सामाजिक बहिष्काराची , आर्थिक परिस्थिती,दुष्काळी परिस्थिती,भुकंपाची परिस्थिती, महापुराची परीस्थिती, असा अनेक भीषण परिस्थितीत खुप लोक उपाशी पोटी राहतात. खुप ठिकाणी भुकबळी पडलेले असताना दिसतात , काही काही भुकेले तर आपल्या आजूबाजूला असतात परंतु त्यांच्या स्वाभिमानी परिस्थिती नुसार भिक मागु शकत नाहीत, भिकारी रस्त्यावर कधी पासून उपाशी आहेत अन्ना पाण्याविना किती व्याकुळ असेल, पीडित,अनाथ, निराधार, दुष्काळग्रस्त,संकटग्रस्त हें आपलेच बंधू कसे उपाशी राहत असतील.या सर्व परिस्थिती चा आढावा आपण खरंच करून बघितलं तर.. कसं कसं वाटतं.. विचार करून करून.
भुक ही जात नाही तर परिस्थिती आहे यामुळे जाती -:पातीच्या भिंती तोडून कोणताही मनुष्य किती हीं निर्दयी असला तरी मनाच्या एका तरी कप्यात परोपकारी वृत्तीची भावना उत्पन्न होतेच आणि अल्लाह (परमेश्वर - भगवंताला) ला रोजा तुन हेच अपेक्षित आहे. हेच खरं अंतिम सत्य इस्लाम ला मान्य आहेत.हेच अल्लाह ( परमेश्वर ईश्वर भगवंत )पवित्र कुर आन, पैगंबर मुहम्मद स्व.रमजान मधील रोजा उपवावातून संदेश देण्याचा उद्देश आहेत की.दुसऱ्यांना जगण्याची प्रेरणा व बरोबर घेऊन चला.,जगा आणि जगु द्या ( क्रमशः).
(मित्रांनो, लेख आपणास आवडल्यास कोणताही बदल न करता आपल्या मित्रांना आवश्य पाठवा. प्रतिक्रिया अवश्य कळवा).
*आपला मित्र -
डॉ. सलीम सिकंदर शेख*
बैतुशशिफा मल्टिस्पेसिलिटी हॉस्पिटल.
मिल्लतनगर
श्रीरामपूर
मोबाईल :- 9271640014




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा