Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २२ फेब्रुवारी, २०२६

रमजान मुबारक 2026 रोजा नं. 04, रविवार दिनांक 22 - 02- 2026 रोजा :-!!" सेहरी :- याच देही याच अनुभव किती विलक्षण असेल अनुभवा.

 लेखक :डॉक्टर सलीम सईदा सिकंदर शेख 

बैतुशशिफा मल्टिस्पेशालिटी दवाखाना.

मिल्लतनगर.

श्रीरामपूर 

जिल्हा :-अहमदनगर 

मोबाईल नं. 9271640014



हजरत अनस बिन मालिक रजि. प्रेषितांचे मित्र ( सहाबा ) सांगतात,  आम्हाला प्रेषित मुहम्मद स्व. नी सांगितलं , " तुम्ही सेहरी खात चला, तुम्हाला त्या खाण्याने बरकत आहेत ( सहीह बुखारी ह. नं. 1923)." पुढे पैगंबर मुहम्मद स. सांगतात, " सेहरी खाना इबादत ( उपासना - प्रार्थना ) आहेत.



सकाळी (ब्राह्म वेळा ) पहाटे  4-30 ला उठून सूर्योदया पूर्वी कष्टाच्या ( हलाल )कमाई नें आणलेल्या अन्न धान्या नें सकाळी अन्न ग्रहण करणं.म्हणजे सेहरी करणं.

जैद बिन साबित रजि.  पैगंबरांचे मित्र सांगतात, " आम्ही प्रेषिता स.बरोबर रोजा ची सेहरी करून , आम्ही नंतर सकाळची फर्जं (फजर )नमाज अदा केली आहेत. "

 एक म्हण फार प्रसिद्ध आहेत , सकाळचा नास्ता ( ब्रेक फास्ट )राजा ( बादशाह ) सारखा खाणं  अर्थातच पोट भरून करणे   :,  दुपारचं नेहारी (लंच )सामान्य लोकां प्रमाणे अर्थात थोडं कमी प्रमाणे, व रात्रीच जेवण ( डिनर )भिकाऱ्या सारखं अर्थात थोडं फार खाल्लं ".

जगात उपवासची प्रथा वेगवेगळी असतात . हिंदू मध्ये चतुर्थी- एकादशी, शिवरात्र - कोणी मंगळवारी, सोमवार, गुरुवार, शुक्रवार  शनिवार, आपल्या मानलेल्या विविध देवी देवतांच्या वारावर उपवास ठेवतात. काही उपवास प्रोटीन युक्त आहार व चहा पाणी घेऊन करतात तर काही निरंकारी ( काहीच नाहीं खाता पिता ) करतात. फक्त पोटभर खात नाहीत नंतर सध्याकाळी  चंद्र दर्शन झाल्यावर रात्री पोटभर जेवन करून उपवास सोडतात.   जैन व मारवाड भागातील राजस्थानी समाज उपवास  दोन,  तीन तर काही अपल्या आरोग्याला पेलवल, शारीरिक परिस्थिती बघून दिवस भर अन्न पाणी काहीच न घेता संध्याकाळी 24 तासात फक्त्त एक ग्लास दूध- पाणी घेऊन पुढे उपवास चालू ठेवतात किंवा सोडतात व काही दृढ निच्छिय महामानव संथरा व्रत मध्ये महानिर्वाण पावतात.असो.

काही हौशी लोकं  ज्यांना हेल्थ कॉनशियस ( शरीराला जपणारे ) मंडळी हें वजन कमी करण्यासाठी काही नवनवीन फंडे चे प्रयोग करत असतात.

बाजारात मल्टिनॅशनल कंपनी पुष्कळ आलेल्या आहेत त्या आपल्या ग्राहकांना वजन कमी करणं व वाढविण्यासाठी नवीन नवीन प्रयोग करीत असतात.

इस्लाम मध्ये सकाळी" सेहरी " करून संध्याकाळी सूर्यास्ता नंतर लागलीच"  इफ्तार "(सोडतात ) . जवळ जवळ 12-ते 13 तासांचा रोजा असतो परुंतु काही देशात रोजे 20-20 तासांचे व कॅनडा देशात 20 तासांचे  आहेत.

आपल्या कुवतीप्रमाणे अन्न ची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे,  गरजेचं सुद्धा आहेत तीस (30) दिवस उत्साह,  उत्सपूर्तता,  स्टॅमिना हा टिकला  पाहिजे.  अन्नाच्या प्रत्येक गोष्टी कडे लक्ष दिले गेले पाहिजे दिवस भर थकवा जाणवू नये म्हणून संतुलित पोषण युक्त आहार गरजेचे आहे. शरीर निरोगी राहिले पाहिजे,  आज फेब्रुवारी  हलकी हलकी थंडी संपून उन्हाळा ची सुरुवात झाली आहेत,अजून त्या ऋतू मान सहन करण्यासाठी सवय झालेली नाहीत, सवय होईस्तर त्रास हा होणारच असतो. म्हणून संतुलित व पोषण युक्त आहारासाठी कडघान्य, ओट्स, अंडी, मटन, मासे, दुध, दही, व्हिटॅमिन युक्त, प्रोटीन युक्त, कार्बहैद्राड, मिनरल्स आहार घेणं फार गरजेचे आहेत,  शिजवून घेतलेलं पदार्थ जास्त महत्वाचं आहेत, ज्यांना जास्त प्राधान्य द्यावा, 

सेहरी नंतर दोनतीन तासात शरीरातील पाणी लघवीद्वारे हळू हळू मोकळं होतं. दुपारी एक दोन नंतर  डीहायड्रेशन होण्याची शक्यता असते,  इलेक्ट्रॉलाईटची पातळी कमी होण्याची कधी कधी शक्यता असतं तर मिठा चं प्रमाण व पाण्याचे प्रमाण योग्य ठेवणं गरजेचं असतं 

सध्याच्या काळातील  फास्ट फूड च्या नादी न लागलेलं बरं. काही काहीच कंपनी आपल्या प्रॉडक्ट ला चांगली मागणी यावी व प्रॉडक्ट रुचकर व स्वादिष्ट होवं म्हणून त्या मध्ये चवी साठीच सिनथेठीक पदार्थांचा वापर जास्त प्रमाणात केलेला असतो. म्हणून  आपल्या शारीरिक व मानसिक व आर्थिक परिस्थिती नुसार नियोजन करून आपल्या शरीराची काळजी जरूर घावी.

कामगार कष्टकरी मंडळी आपल्या दिवस भराच्या कमाईनें आणलेल्या अन्न  कुटंबाबरोबर चटणी भाकरी सेहरी किती अविस्मरणीय अनुभव असेल ना??.

दोन चार रोजे (उपवास ) ठेवून  याचं देही याच अनुभव किती विलक्षण असेल..

(मित्रांनो लेख आवडला तर आपल्या नातेवाईक व मित्रांना जरूर पाठवा, कृपया आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.)


लेखक :डॉक्टर सलीम सईदा सिकंदर शेख 

बैतुशशिफा मल्टिस्पेशालिटी दवाखाना.

मिल्लतनगर.

श्रीरामपूर 

जिल्हा :-अहमदनगर 

मोबाईल नं. 9271640014

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा