Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०२६

गाडीवरच्या झेंड्यात आणि रस्त्यांवरच्या पोस्टरवर हरवत चाललेली आधुनिक शिवजयंती...!!

 *प्रेरणा विकास गायकवाड (विद्यार्थिनी)*

*शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज जि.सोलापूर*



शिवजयंती साजरी करण्याची परंपरा कोणी सुरू केली, हे जाणून घेणं आधी रंजक आहे. खरंतर

महात्मा जोतिराव फुले: यांनी १८७० मध्ये रायगडावरील शिवरायांची समाधी शोधून काढली आणि पुण्यात पहिली शिवजयंती साजरी केली. त्यानंतर लोकमान्य टिळक: यांनी या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले, जेणेकरून लोक एकत्र येतील आणि त्यांच्यात राष्ट्रवादाची भावना जागृत होईल. परंतु या दोन महापुरुषांनी सुरू केलेली ही शिवजयंतीची परंपरा आज बदलत्या काळानुसार वेगळेच वळण घेऊ लागली आहे..!! तरुणाई मधला सळसळता जोश आज गाड्यांच्या झेंड्यांवर आणि रस्त्यांवरच्या बॅनर वर झळकू लागला आहे..!! पण मला असा प्रश्न पडतो की गाडीला झेंडे लावले आणि रस्त्यांवर बॅनर लावले तरच शिवजयंती साजरी करता येते का ?? मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये जे काही अत्याचाराची प्रकरण घडली त्या काळामध्ये आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली चौरंगाची‌ शिक्षा आठवली. पण काय उपयोग त्या आठवलेल्या शिक्षेचा शेवटी सोशल मीडिया सोडलं तर आम्ही त्या चिमुरडयांना कुठेच न्याय मिळवून देऊ शकलो नाही..!! तेवढ्या काळा पुरते बोलणारे अनेक मिळतात परंतु कृती करणारे मात्र मोकाट फिरतात...! 


शिवाजी महाराजांना मानवंदना करण्यासाठी ‌ आपण सगळेजण शिवजयंती अगदी उत्साहात साजरी करतो खरतर शिवजयंती हा तब्बल दोन दिवस चालणारा सण आहे. आणि वर्षातून तीन वेळा साजरी होणारी देखील एकमेव जयंती आहे..!! पण दुर्दैव हेच की वर्षातून तीन वेळा शिवजयंती साजरी केली तरी प्रकाश मात्र डोक्यात एकदाही पडत नाही..!! प्रत्येक वर्षी उठायचं गाड्यांना झेंडे लावायचे, रस्त्यांवर पोस्टर लावायचे आणि 19 फेब्रुवारी च्या रात्री डीजे लावून नाचायचं.. खरंतर दुर्दैव आहे की रस्त्यांवर लावलेल्या पोस्टरवर फक्त राजे नसतात त्यांच्यासोबत आपले स्वतःचेही फोटो झळकतात ! म्हणजे जयंती राज्यांची पण त्यांच्यासोबत आमचे ही नाव झालं पाहिजे हा कुठला विचार !! अगदी गणपतीच्या मंडळांसारखी अनेक मंडळ उभा करायची. आणि प्रत्येकाचे शिवराय वेगळेवेगळे ! म्हणजे आम्ही विज्ञानाच्या, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रगतीच्या वाटेवरती नक्की वाटचाल करू लागलो, परंतु ज्या महापुरुषांमुळे आज आपण या सगळ्या सजीव निर्जीव गोष्टी अनुभवू शकतोय त्या महापुरुषांच्या बाबतीत मात्र आम्ही प्रगतीत कुठेतरी मागे राहिलो !  अशी किती मंडळ आहेत महाराष्ट्रात कि ती शिवजयंतीला शिवरायांच्या विचारांना सादर करतात, लहान मुलांना, वृद्धांना, तरुणांना शिवराय कोण होते हे समजावून सांगतात. त्यांची पुस्तक, त्यांचे जीवन उलगडून सांगतात ? अगदी काही मंडळ आहेत की जे व्याख्यात्यांना बोलावतात, छोट्या छोट्या नाटकातुन शिवरायांचे विचार मांडतात, परंतु तास दीड तासात मांडलेले शिवरायांचे जिवन आम्हाला पुढच्या शिवजयंती पर्यंत कसे लक्षात राहणार?? म्हणून शिव     जयंतीला शिवराय फक्त सांगायला नाहीतर वाचायलाही दिले पाहिजेत..!!

 नाहीतर बाकी कडे मात्र सालाबाद प्रमाणे मूर्ती बनवा त्याला लाखोंनी पैसा खर्च करा, डीजे बोलवा त्याला वायफळ पैसा खर्च करा..!! परत शिवरायांचा अभिषेक, तोफा ,लाईट, झेंडे या सगळ्या गोष्टींवर बोलायलाच नको!! शिवराय प्रत्येकाला माहिती आहेत त्यामुळे त्यांचे पुतळे किंवा मुर्त्या उभारून उपयोग नाही..!! उभे करायचे असेल ना तर शिवरायांचे माहीत नसलेले विचार उभे करा. त्यांचा इतिहास उलगडून सांगा आणि फक्त इतिहास इतिहासात जमा न करता त्याला आजच्या काळामध्ये कसा उपयोगात आणता येईल ते समजावून सांगा..!! अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला हे सगळ्यांनाच माहिती आहे,पण त्या राक्षसापर्यंत जाण्यासाठी किती धाडस मनी बाळगावे लागते हे आजच्या मुलांना समजावून सांगा. शत्रूच्या छावणीत जाऊन त्याची बोट कापण्यासाठी लागणार धाडस आजच्या मुलांमध्ये निर्माण करा. छोट्या छोट्या कारणावरून आत्महत्या करणारी ही पिढी शिवरायांचा आदर्श घेऊन उभा करा..!! मग बघू दहावी, बारावीच्या पेपरला सामोरे जाण्याआधी होणारी आत्महत्यांची संख्या कशी कमी होत नाही ते..!!

कारण आजच्या तरुणाईला शिवराय कसे दिसत होते? कोण होते? हे माहित आहे आता फक्त गरज आहे, शिवरायांच्या विचारांची, त्यांच्या न्यायव्यवस्थेची, त्यांच्या धाडसीची, त्यांच्या बुद्धीची आणि त्यांच्या स्वराज्याची....!!!

चला तर मग या शिवजयंतीला गाडीवरच्या झेंड्यांपेक्षा आणि रस्त्यांवरच्या पोस्टरपेक्षा शिवरायांच्या विचारांवर अभ्यास करु...!!*


 *प्रेरणा विकास गायकवाड*

 *अकलूज* (विद्यार्थिनी) 

शंकरराव मोहिते महाविद्यालय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा