Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २ जुलै, २०२६

वटपौर्णिमा आणि कृषी दिनाचे औचित्य साधत जिजाऊ ब्रिगेडतर्फे भव्य वृक्षारोपण; निसर्ग संवर्धनाचा दिला अनोखा संदेश जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे विभागीय अध्यक्षा प्रा. डॉ. मीनाक्षी अमोल जगदाळे व त्यांच्या टीमचा स्तुत्य उपक्रम;

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*


सोलापूर ,टेंभुर्णी,तालुका माढा येथे वटपौर्णिमेच्या सणाचे औचित्य साधून अनेकदा परंपरेनुसार पूजेसाठी झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. मात्र, या प्रथेला फाटा देत निसर्ग संवर्धनाचा एक नवा आणि आदर्श पायंडा जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे विभागाच्या वतीने पाडण्यात आला आहे. 'झाडांच्या फांद्या न तोडता, नवीन झाडे लावा' असा महत्त्वपूर्ण व विधायक संदेश देत, तसेच १ जुलै कृषीदिनाचे औचित्य साधून जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे विभागीय अध्यक्षा प्रा. डॉ. मीनाक्षी अमोल जगदाळे आणि त्यांच्या टीमच्या वतीने भव्य वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली.


१ जुलै हा दिवस महाराष्ट्रात कृषी दिन म्हणूनही ओळखला जातो. या दिवसाचे आणि वटपौर्णिमेचे महत्त्व एकत्र जपत हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. 

पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल राखण्यासाठी केवळ वृक्षारोपण करणे पुरेसे नसून, लावलेली झाडे जगवणे आणि त्यांचे संवर्धन करणे तितकेच महत्त्वाचे आहे, ही बाब या मोहिमेदरम्यान अधोरेखित करण्यात आली.


यावेळी परिसरामध्ये विविध देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. केवळ रोपे लावून न थांबता, उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी या लावलेल्या झाडांचे पुढील काळात संगोपन करण्याची आणि त्यांना जगवण्याची जबाबदारीही स्वीकारली.


“सण आणि उत्सव साजरे करताना निसर्गाची हानी होणार नाही, याची काळजी घेणे ही आता काळाची गरज आणि आपली सामूहिक जबाबदारी आहे. पूजेसाठी झाडांच्या फांद्या तोडून पर्यावरणाचे नुकसान करण्याऐवजी, आपण सर्वांनी नवीन झाडे लावून निसर्गाप्रती आपली खरी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे."

जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती शीलाताई पाटील 

सणांच्या नावाखाली होणारी वृक्षांची हानी थांबवून, प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावून ते जगवण्याचा संकल्प करावा, असे आवाहन सौ सुवर्णा ताई भोसले यांनी यावेळी केले 

या कार्यक्रमासाठी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती शीलाताई पाटील ,उपाध्यक्ष सौ सुवर्णा ताई भोसले,संघटक सारिका महाडीक,सौ सुप्रिया भोसले,सौ सविता जगताप,सौ कुसुम फाळके,सौ विद्या धनवे तसेच इतर महिला सदस्य उपस्थित होत्या. सर्वांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.ठिकठिकाणी झाडे लावली.

जिजाऊ ब्रिगेडच्या या पर्यावरणपूरक आणि स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून मोठे कौतुक होत आहे. या विधायक कार्यामुळे समाजासमोर एक अतिशय सकारात्मक आणि अनुकरणीय आदर्श निर्माण झाला हे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा