Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २० ऑगस्ट, २०२४

*तेंव्हा आम्ही हिंदुस्थानी होतो सारे*


 

*गुलाम होतो तेव्हा आम्ही हिंदुस्थानी होतो सारे!*

*मिळताच स्वातंत्र्य आम्हा*

*आम्ही हिंदू मुस्लिम झालो रे!!*


*करो या मरो चे लावले होते*

*मिळून साऱ्यांनी नारे!*

*भासते वारंवार आता*

*शहीदांचे स्वप्न राहिले अधुरे!!*


*तिरंग्यातील तीन रंग आहेत*

*सर्वांना एकत्र बांधणारे!*

*दिसतायत आता सर्वच धार्मिक रंग ओढणारे!!*


*रक्ताचे पाट वाहिले देशासाठी*

*विसर आता सर्वांना पडलारे!*

*ऐकतेचा भाव आता अनेक रंगात बुडला रे!!*


*शाहिदांच्या स्वप्नातील भारत*

*आता गद्दारांनी फाडला रे!*

*ज्यांच्या हाती देश सोपवीला*

*त्यांनीच बंधुभाव गाडला रे!!*


*आयते फळ चाखायला मिळाले म्हणून विसरले सारे!*

*शाहिदांचे ते देशाला एकत्र बांधणारे एकात्मतेचे नारे !!*


*तिरंगा सांगतो सदा*

*एकात्मतेला जपा रे!*

*धर्मभेद विसरा ,जगाला*

*अनेकतेतून ऐकता दाखवा रे!!*


*नूरजहाँ शेख*

*गणेशगांव*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा