Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०२५

पैसे असेल तरच निवडणूक लढवावी का ? सामाजिक कार्यकर्त्यांना मतदारांचा पाठिंबा का नाही ? मतदारांनी विचार करण्याची गरज ! निवडणुकीत पैसा वाटणारे उमेदवार लोकांसाठी नव्हे तर स्वतःच्या फायद्यासाठी गुंतवणूक करतात !

 संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:--  9730 867 448

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसा पैसा विरुद्ध कार्य हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

गावपातळीवर वर्षानुवर्षे लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, संकटाच्या काळात धावून जाणारे, समाजासाठी झटणारे कार्यकर्ते निवडणुकीच्या वेळी मात्र मागे पडतात. तर पैशांची ताकद, गटबाजी आणि दिखाव्याच्या बळावर उमेदवार मैदानात उत्तरतात आणि निवडून येतात, त्यामुळे मतदारांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. पैसे असेल तरच निवडणुक लढवावी का? अनेक ठिकाणी निवडणुकीचा स्वरूप खचीक होत चालला आहे.

प्रचारासाठी गाड्या, पोस्टर बॅनर, जेवणावळी, माणसे फिरतणे यासाठी लाखोंचा खर्च होत असल्याने ज्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नाही अशा कार्यकत्यांना सुरुवातीपासूनच

स्पर्धेत अडचणी येतात. हेच कार्यकर्ते वर्षानुवर्षे सामाजिक कामात गुंतलेले असतात, लोकांच्या अडीअडचणीत हजर असतात, पण मतदानाच्च्त्या वेळी मतदार तो चांगला माणूस आहे एवढेच सांगतात, मत मात्र पैशावर किंवा गटबाजीत आधारलेल्या उमेदवारांनाच देतात. त्यामुळे खरे सामाजिक कार्यकर्ते निवडणुकीत कोलमडतात आणि पैशाच्या जोरावर निवडणूक लढवणा-यांचा विजय होती. लोकशाहीत मतदार राजा असती, पण जर मतदारांनी सजगपणे विचार न करता पैशावर, लाभावर आधारित मतदान केले, तर विकासाच्या प्रश्नांवर त्याचे दूरगामी परिणाम होतात. निवडणुकीत पैसा वाटणारे उमेदवार लोकांसाठी नव्हे तर स्वतःच्या

फायद्यासाठी गुंतवणूक करतात आणि नंतर ती वसूल करतात, ही कटू वस्तुस्थिती आहे. समाजासाठी सातत्याने काम करणाऱ्यांना खरा पाठिंबा मिळावा यासाठी मतदारांनी

आपली मानसिकता बदलण्याची आणि विकासाला प्राधान्य देणारे मतदान करण्याची गरज आहे.


निष्ठावंताने पक्षासाठी आयुष्यभर सतरंज्या उचलाव्यात, पण तिकीट मागूच नये का ?

अनेक कार्यकर्ते आपल्या गावात, मतदारसंघात लोकांमध्ये काम करून नाव निर्माण करतात. परंतु तिकीट वाटपाच्या वेळी गटबाजी, अर्थिक ताकद, वरच्या स्तरावरील शिफारसी, राजकीय सौदे यांना प्राधान्य दिले जाते. बंद होतात. परिणामी, जमिनीवर खऱ्या अर्थानि पक्षासाठी घाम गाळणारे कार्यकर्ते उपेक्षित राहतात. त्यांना तू तर आपला आहेस या एका वाक्यात शांत केले जाते.


हे कार्यकर्ते वर्षानुवर्षे नेतृत्वाची मानमरातब सांभाळतात, सभा सजवतात, पोस्टर लावतात, बॅनर वाहतात, जनतेत प्रचार करतात, पण निर्णायक क्षणी त्यांच्यासाठी दरवाजे बंद होतात.


साभार

पार्श्वभूमी




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा