Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०२३

*हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त*

हिंदूह्रदयसम्राट


 

*टाइम्स 45 न्यूज मराठी, अकलूज*.

                         *जन्म - २३ जानेवारी १९२६ (पुणे)*
*स्मृती - १७ नोव्हेंबर २०१२ (मुंबई)*

*बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार त्या काळात आपल्या लेखनातून, वक्तृत्वातून तसेच कार्याच्या माध्यमातून* *लोकजागरणाची धुरा सांभाळत होते. प्रबोधनकार अन्यायकारक रूढी, परंपरांवर व जातिभेदात्मक वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवत होते*. *तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण होते. प्रबोधनाचा, पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा* *प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्ये ही कळत नकळतपणे उतरला. सर्वप्रथम एक कलाकार म्हणून, एक व्यंगचित्रकार म्हणून, त्यांनी सामाजिक प्रश्र्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. १९५० मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले* *होते. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नल मध्ये काम करीत* *असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व* *नियतकालिकांसाठी चित्रे, व्यंगचित्रे, जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत होते. पुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वत:चे साप्ताहिक* *(व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना* *प्रबोधनकारांनीच सुचविले. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले.* 

*मार्मिक*च्या *पहिल्या* *अंकाचे* *प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री* *यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले*. *या समारंभास प्रा*. *अनंत काणेकरही उपस्थित होते*. *महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी मार्मिकची सुरुवात केली.* *संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता.* *या प्रश्र्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणार्यांना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला*. *१९६० पासून ते आजतागायत राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आले होते.* *महाराष्ट्रात निर्माण झालेले, मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही*. *त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला*. *हर हर महादेवची* *गर्जना मराठी माणसाच्या मनात पुन्हा एकदा घुमायला हवी* *आणि प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्राचा स्वाभिमान मनात बाळगायला हवा*. 
*एक दिवशी वडिलांनी, प्रबोधनकार ठाकरेंनी प्रश्न विचारला,* *बाळ लोके तर जमली पण याला संघटनेचे रुप देणार कि नाही*? *काही नाव सुचतय का संघटने साठी*?” *बाळासाहेब बोलले, ”विचार तर चालु आहे, पण संघटनेला नाव मि सांगतो नाव "शिवसेना*" *यानंतर बाळासाहेबांनी १९ जून १९६६ रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली*. *वक्तृत्वा बरोबरच भेदक लेखन हे देखील बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य.* *प्रबोधनकार ठाकरे व प्रल्हाद केशव अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय* *व्यंगचित्रकाराची वेधक*- *वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये आहेच*. 

*सामना’ हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र नसून जिवंत महाराष्ट्रीय माणसाचा तो हुंकार आहे* *असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही*. *शिवसेनाप्रमुख बाळासाहेब व भाजप चे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या मुत्सद्दीपणातून शिवसेना-भाजप युती आकाराला आली*. *तसेच पुढे प्रामुख्याने शिवसेनाप्रमुखांच्या झंझावाती सभांमुळे*, *दौऱ्यांमुळे १९९५ मध्ये शिवसेना-भाजपा चे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले आणि मनोहर जोशी हे शिवशाहीचे पहिले मुख्यमंत्री बनले*. *हे महाराष्ट्रातील खऱ्या अर्थाने पहिले कॉंग्रेसेतर सरकार होते*. *हा सत्तांतराचा चमत्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्व व कार्यशैली मुळेच घडला*. *हिंदुत्व या मुद्याबाबतही बाळासाहेबांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले*. *बॉंबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणार्यास धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही*. *मतपेटीचे राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये.* *भारताला आपला देश मानणाऱ्या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही*. *असे स्पष्ट विचार त्यांनी* *शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले होते*. *या स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच 'हिंदुहृदयसम्राट' ही त्यांना प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते.* *गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषणेला खरा अर्थ महाराष्ट्रात प्राप्त झाला तो शिवसेना* *प्रमुखांमुळेच*.

*संजीव वेलणकर, पुणे*
*९४२२३०१७३३*
*संदर्भ : इंटरनेट*
*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा