Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २५ फेब्रुवारी, २०२४

*राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या" तुतारी "चिन्हाच्या अनावरणानंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया;--- महाराष्ट्राचे तिथी बदलायचे असेल तर....*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

              राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह देण्यात आले. त्यानंतर या चिन्हाच्या अनावरण सोहळ्यासाठी रायगडावर शरद पवार गटाकडून मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमित शरद पवार यांच्या हस्ते या चिन्हाचे अनावर करण्यात आले. यावेळी शरद पवार रोप वे च्या माध्यमातून रायगड किल्ल्यावर पोहचले. त्यानंतर पालखीच्या माध्यमातून त्यांना कार्यक्रमस्थळी नेण्यात आले. तब्बल 40 वर्षानंतर शरद पवार रायगडावर आले होते.

सध्याचा संघर्ष वैचारिक – शरद पवार

रायगडावर पक्षचिन्हाचे अनावरण झाल्यानंतर शरद पवार यांनी तुतारी जनतेला प्रेरणा देईल, या ऐतिहासिक भूमीतून प्रेरणा घेऊन राज्य उभं करु, असा विश्वास जनतेला दिला. "सध्याचा संघर्ष हा वैचारिक आहे. या देशात अनेक राजे झाले, संस्थानिक झाले परंतु रयतेचा राजा एकच झाला. सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती आहे. शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते.”

पुढे ते म्हणाले, “आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा याठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील. निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकायला तुतारी दिली आहे. पुन्हा जनतेचं राज्य येण्यासाठी कष्ट करायला लागेल. ही तुतारी प्रेरणा देणारी आहे. या ऐतिहासिक भूमीतून प्रेरणा घेऊन राज्य उभं करु, जनतेचे राज्य बनवू,” असा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला.

शरद पवार गटाच्या चिन्हाचे अनावरण शनिवारी किल्ले रायगडवरुन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, राजेश टोपे यांच्यासह पक्षाचे नेते उपस्थित होते.


              *सौजन्य*

             *कोकण न्यूज*









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा