*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
म्हसवड येथील माण नदीत पाणी सोडून बंधारे भरण्याबाबत तसेच येरळवाडी ता. खटाव येथील तलावात पाणी सोडून ते भरून घेण्याबाबत चे निवेदन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार -"धैर्यशील मोहिते पाटील" यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांना देऊन मागणी केली आहे
त्याबाबत सविस्तर वृत्त असे की
उपरोक्त विषयास अनुसरून म्हसवड ता. माण या नगर परिषदेला सध्या ८ दिवसातून एकदा पिण्याचे पाण्याचा पुरवठा केला जात आहे व सध्या वाडीवस्तीसाठी टँकरनी पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे येथील नागरिकांची पाण्यासाठी मोठी वणवण चालू आहे.
तरी म्हसवड येथील माण नदीमध्ये उरमोडी प्रकल्पाचे अथवा जिहे कटापुर प्रकल्पाचे पाणी सोडुन बंधारे भरलेस येथील पाणी पातळी वाढलेस विहरी व बोअर चालू होउन पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल.
तरी म्हसवड येथील माण नदीमध्ये उरमोडी प्रकल्प अथवा जीहे कटापुर बंधारे भरणेबाबत संबंधीतास आदेश व्हावेत अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
*येरळवाडीप्रकल्पा मध्ये पाणी सोडणे बाबत*
तसेच येरळवाडी मध्यम प्रकल्पाचे साठवण क्षमता ही 32.8 दशलक्ष घनमीटर असून या प्रकल्पामध्ये सध्या ते 30 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे या प्रकल्पावर 45 गावांच्या पाणीपुरवठा योजना औद्योगिक वसाहतीसाठी लागणारे पाणी तसेच लाभक्षेत्रातील शेती सिंचनासाठी लागणारे पाणी प्रकल्प आराखड्यामध्ये समाविष्ट आहे सध्या लाभक्षेत्रामध्ये पाऊस मान कमी असल्यामुळे या धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता भविष्यातील पिण्याच्या पाण्याची योजना औद्योगीकरणासाठी लागणारे पाणी तसेच शेती सिंचनासाठी पाण्याची नितांत गरज भासणार आहे यासाठी या प्रकल्पामध्ये जी हे कटापूर योजना केव्हा उरमोडी प्रकल्पामधून पाणी सोडून येरळवाडी तलाव भरणे अत्यंत गरजेचे आहे तरी येरळवाडी प्रकल्पात पाणी सोडणे बाबत आपले स्तरावरून संबंधितांना योग्य ते आदेश व्हावेत अशी मागणी निवेदनाद्वारे केले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा