*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147
--------
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. २९ ऑक्टोबर शेवटच्या दिवसापर्यंत राज्यातील २८८ मतदारसंघांत ७ हजार ९९५ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. नामनिर्देशन पत्रांची दि. ३० ऑक्टोबर रोजी छाननी करण्यात आली. राज्यातील २८७ मतदारसंघातील एकूण ७ हजार ९६७ उमेदवारांपैकी ७ हजार ५० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर ९१७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.
५६ - नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात २७ उमेदवारांपैकी २२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर ०४ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
------------------
*२८८ मतदारसंघासाठी राज्यातून ७९९५ उमेदवारांचे १०९०५ नामनिर्देशन पत्र दाखल*
-------- : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघासाठी निवडणुकीकरिता दि. २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख २९ आक्टो होती. आलेल्या अर्जांची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा