Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २३ जून, २०२५

*तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील ग्रामपंचायत औद्योगिक वसाहत मधील कंपन्यांच्या करा संदर्भात माहिती च्या संदर्भात--- शिवाजीराव सावंत (माजी सैनिक) यांचे आमरण उपोषण*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी येथील ग्रामपंचायतने तेथील औद्योगिक वसहतींमधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त नावाजलेल्या कंपन्यांनी त्यांच्याकडून भरण्यात येणाऱ्या करासंदर्भातील कागदपत्राची माहिती द्यावी याकरिता श्री सावंत शिवाजी रामकृष्ण (माजी सैनिक) तथा अध्यक्ष, आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, तामलवाडी यांनी यापूर्वीच २४ ऑगस्ट २०२३ रोजी लाक्षणिक उपोषण केले गेले होते त्यावेळी त्यांच्या निवेदनात त्यांनी असे नमूद केले होते की, तामलवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्राअंतर्गत शासकीय नियमावली प्रमाणे कमीत कमी दराने जवळपास सव्वा कोटी कर आकारणी करून संकलन केले जाऊ शकते भविष्यात या निधीचा वापर गावातील पायाभूत सुविधा जसे सिमेंट रस्ते बनवणे, पाणीपुरवठा सुव्यवस्थित करणे, आरोग्य उपकरण उपलब्ध करणे, जिल्हा परिषद शाळेला डिजिटल शाळा बनविण्याकरिता साहित्य खरेदी करणे, कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन तसेच ज्या इतर मूलभूत सोयी सुविधांचा अभाव सर्वसामान्य जनतेकरता गावात आहे त्या पूर्ण करण्यासाठी औद्योगिक वसाहत करिता करवाढ करून वसुली करणे आवश्यक आहे त्या आंदोलनादौरान प्रशासनामार्फत श्री सावंत (माजी सैनिक) यांनी मागणी केलेली सर्व कागदपत्रे उपलब्ध करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीद्वारे कालावधी किंव्हा वेळ मागण्यात आला होता व लेखी स्वरूपात आश्वासन विस्तार अधिकारी (पंचायत) ए.सी.कावळे, ग्रामसेवक चैतन्य गोरे व सरपंच नूरबानू सिकंदर बेगडे यांच्या मध्यस्थीने देऊन उपोषण स्थगित करण्यात आले होते प्रशासनाने उपोषणकर्त्यांकडून मागणी केलेली मुदत संपल्यानंतर उपोषणकर्ते श्री सावंत (माजी सैनिक) यांनी सरपंच सौ नूरबानू सिकंदर बेगडे यांना ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये कंपनीच्या कागदपत्रांची मागणी केली त्यावेळी सौ बेगडे यांनी उपोषणकर्तेना कळवले की, आजच्या तारखेस ग्रामसेवक व ग्रामपंचायत लिपिक यांच्याकडे मी चर्चा केली त्यावेळी खालील कंपन्यांचे कोणतेही कागदपत्र ग्रामपंचायत कार्यालय तामलवाडी येथे उपलब्ध नाहीत किंवा काही कंपन्यांनी सादर केलेले नाहीत त्यासंदर्भात त्यांना पत्राद्वारे मागणी केली आहे बालाजी अमाईन्स लिमिटेड, व्यंकटेश्वरा सिमेंट प्रोडक्ट, व्यंकटेश्वर प्लास्टिक इंडस्ट्रीज, पद्मावती इंडस्ट्रीज, कटारे स्पिनिग मिल लि कमलानगर, कटारे सौरऊर्जा प्लांट, गोरज गॅस इंडस्ट्रीज, विश्व इंडस्ट्रीज, महानंदी पाईप इंडस्ट्रीज, साई प्लास्टिक इंडस्ट्रीज, महेश प्लास्टिक इंडस्ट्रीज,साई स्पन इंडस्ट्रीज, किसान इरिगेशन इंडस्ट्रीज, विक्रांत प्लास्टिक इंडस्ट्रीज, मेगा संजय पतंगे इंडस्ट्रीज, तुषार विलास पतंगे इंडस्ट्रीज, महालक्ष्मी इंडस्ट्रीज, साई इंडस्ट्रीज, मराठवाडा इंडस्ट्रीज, मोरया स्टोन क्रेशर, रामलाल बाबुराव विटकर स्टोन क्रेशर, दयानंद चंद्रकांत मंठाळकर स्टोन क्रेशर व विमल पेपर मिल इत्यादी त्यामुळे श्री सावंत यांनी दुसऱ्यावेळा म्हणजे ३० नोव्हेंबर २०२३ रोजी उपोषण करण्याची पाळी आली होती, उपोषणकर्तेच्या मागणीप्रमाणे १५ दिवसात कागदपत्राची पूर्तता करू असे लेखी स्वरुपात आश्वासन सरपंच व ग्रामसेवक यांनी विस्तार अधिकारी यांच्याशी चर्चा करून दिले आहे, जर उपोषणकर्तेयानी यानंतर उपोषणाचे निवेदन सादर केल्यास त्यांच्या तारखेपूर्वी त्या कागदपत्रासाठी मी म्हणजे सरपंच, ग्रामपंचायत तामलवाडी स्वतः इंडस्ट्रीज असोसिएशन तामलवाडी चे अध्यक्ष श्री राजेश्वर रेड्डी यांची कंपनी बालाजी अमाईन्स लिमिटेड कंपनीसमोर ग्रामपंचायत सदस्यसह चर्चा करून उपोषणास बसेन त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाचे असेल तसेच हा विषय सरपंच संघटनेमार्फत मा. मुख्यमंत्र्यापर्यंत येत्या हिवाळी अधिवेशनात धाराशिव - कळंबच्या लोकप्रतिनिधी नेणार असं वरील सर्व विषयाबाबत तामलवाडी परिसरातील वृतपत्र प्रतिनिधींना कळवले होते तेव्हा वृतपत्र प्रतिनिधींनी लोकांमध्ये वरील विषयाशी लोकभावना जाणण्याचा प्रयत्न केला तेंव्हा लोकभावना तीव्र झालेल्या असून चर्चेस उधान आले होते की, उपोषणकर्ते यांनी मागणी केलेल्या कागदपत्रासंदर्भाचा संबंध कर चुकवेगिरी, सद्या ग्रामपंचायत कार्यालय तामलवाडी मार्फत घेण्यात आलेल्या औद्योगीक करवाढ ठरावाशी व विनापरवाने उत्पादन निर्मिती करण्याशी आहे असे लक्षात आल्यानंतर ग्रामपंचायत सर्व कंपन्यांना मागणी बिल, रीट बिल व फायनल बिल देण्यात आले होते, कंपनी मालकाद्वारे काही राजकीय प्रतिनिधींच्या आश्रयाने वरील करवाढ रद्द करण्यासाठी प्रशासनावर दबाव तंत्राचा वापर करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून सदरील विषयाचे गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर यांच्याकडे सुनावनी चालू असताना बालाजी अमाईन्स लिमिटेड या कंपनीच्या प्रतिनिधी व कायदे सल्लागार यांनी ग्रामपंचायत कार्यालय तामलवाडी मार्फत करण्यात आलेल्या कर मोजमाप संदर्भात आक्षेप नोंदवून कर फेर मोजणी करण्याची मागणी केली त्याप्रमाणे तत्कालीन गटविकास अधिकारी श्री ताकभाते यांनी एक कमिटी नियुक्त करून त्यांना तामलवाडी येथील सर्व औद्योगिक वसाहतीच्या कर फेर मोजमाप करण्याचे आदेशित केले असून सोबतच मागील तीन वर्षाचा थकीत असलेला कर पूर्वीच्या दराने जमा करण्याचे आदेश दिले होते व बाकी किंवा शिल्लक वाढीव कर या विषयाचा निर्णय झाल्यानंतर भरण्याचे आदेश दिले होते ज्याचे अध्यक्ष सहाय्यक गटविकास अधिकारी व सदस्य इंजिनीयर बांधकाम विभाग, विस्ताराधिकारी पंचायत, सरपंच, ग्रामसेवक हे आहेत तसेच संबंधित कंपन्यांना पण नोटीस बजावली असून याचदौरान पंचायत समिती तुळजापूरचे गटविकास अधिकारी श्री ताकभाते यांची बदली तुळजापूर येथून समाज कल्याण विभाग धाराशिव येथे अचानक विना नोटीसीद्वारे तत्काळ करण्यात आली आहे, त्यांना व्यक्तिगत रित्या त्रास किंवा सूड भावनेने वागणूक देण्यात येत होती किंवा त्याचा प्रयत्न केला जात होता याची दबक्या आवाजात चर्चा तुळजापूर तालुक्यातील लोकांमध्ये होत आहे त्यामुळे सदरील औद्योगिक वसाहतीचे मोजमाप तत्काळ करून त्यांना वाढीव कर भरण्याचे आदेशित करण्यात यावे अथवा त्यांच्यावर कायदेशीर वसुली कारवाई करण्यात यावी याकरिता दिनांक २४ जून २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालय तामलवाडी समोर सकाळी १०:०० वाजल्यापासून श्री सावंत (माजी सैनिक) तथा अध्यक्ष, आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, तामलवाडी हे आमरण उपोषणाला बसत आहेत त्यावर तिसऱ्यांदा आंदोलनांची वेळ येत आहे याची माहिती लेखी स्वरूपात त्यांनी मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय यांना मेलद्वारे व पंचायत समिती तुळजापूर व पोलीस स्टेशन तामलवाडी यांना यापूर्वीच प्रत्यक्षात भेट घेऊन दिलेली आहे याकडे सर्व परिसरातील लोकाचे लक्ष वेधून गेले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा