*करमाळा-- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
आमदार नारायण आबा पाटील गट जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक स्वतंत्रपणे लढणार असल्याची अधिकृत माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी दिली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपली असल्याने करमाळा तालुक्यातील सर्वच राजकीय गट उमेदवारांची चाचपणी करत आहेत. अशातच विद्यमान आमदार नारायण आबा पाटील गटाकडून निवडणुकीबाबत भुमिका मांडण्यात आली आहे. यावर सविस्तर बोलताना पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी सांगितले की
आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक ही पुर्ण ताकदीने लढवली जाणार आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकीतील सहकारी गटांना समवेत घेऊन या निवडणुकीची आखणी केली जाणार आहे. परंतू सध्या विरोधकांनी पाटील गटाची भुमिका चुकीच्या पध्दतीने मांडुन जनतेत दिशाभुल करण्याचे काम सुरु केले आहे. विरोधकांनी पाटील गटाच्या भुमिके विषयी वा युती आघाडी विषयी बोलण्याऐवजी स्वतःच्या गटाची व गट नेतृत्वाची भुमिका आपल्या कार्यकर्त्यांना ठासुन सांगावी. आपल्या ताटात काय वाढवून ठेवले आहे हे पहावे. उगीच अफवांची पेरणी करु नये. आमदार नारायण आबा पाटील यांची लोकप्रियता व सर्वसामान्य जनतेविषयी असलेली आस्था तसेच तालूक्याच्या विकासातील महत्वाचे योगदान या विषयी मतदार सर्वकाही जाणुन आहेत. यामुळेच सन २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत तब्बल सतरा हजार मतांच्या फरकाने आमदार नारायण आबा पाटील यांना विजयी करुन दुसऱ्यांदा आमदार पदावर काम करण्याची संधी दिली आहे. आमदार नारायण आबा पाटील गटकडून संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा चालू असुन घोषणा केल्या प्रमाणे नवीन चेहऱ्यांना या निवडणुकीत संधी दिली जाणार आहे. पाटील गटाकडून निवडणुक लढवण्यासाठी अनेक कार्यकर्ते इच्छुक असुन जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जेऊर ता करमाळा येथे प्रमुख कार्यकर्ते मेळावा होणार असुन या बैठकीत सदर निवडणुकी विषयी कार्यकर्त्यांची मते जाणुन घेतली जातील असेही प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी सांगितले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा