*अकलूज प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
माळशिरस तालुक्यात यावर्षी वरूणराजाने हुलकावणी दिली आहे.बळीराजा मात्र आभाळाकडे लक्ष लावून बसला आहे. अकलूजला यंदा पावसाने अल्पशा प्रमाणात हजेरी लावली आहे
.त्यामुळे शेतकरी वर्ग पेरणी करण्या वाचून खोळंबून बसला आहे तर उन्हाळ्यात जमीनीला पडलेल्या भेगा अजून बुजल्या पण नाही आहेत.सध्या वीर व भाटघर धरण परिसरात मुसळधार पाऊस पडल्यामुळे धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे नीरा नदी मात्र दुथडी भरून वाहत आहे.गेल्या दोन महिन्यापासून माळशिरस तालुक्यातील बळीराजा पावसाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत आहे
.(छाया:-केदार लोहकरे अकलूज)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा