इंदापूर तालुका...... प्रतिनिधी
एस. बी. तांबोळी,
मोबाईल -8378081147
: गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे गणेशवाडीतील (ता. इंदापूर) कुंभारवाड्यात मूर्तिकार गणेश मूर्तीवर अखेरचा हात फिरविण्यात मग्न आहेत. गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट असून त्यातच कच्च्या मालाचे दरात वाढ झाल्याने गणेशमुर्तीच्या दरातही वाढ करावी लागणार असल्याचे कारागीरांनी सांगितले.
वरूणराजाने मागील साडेचार महिन्यात हजेरी लावली नसल्याने दुष्काळाची छाया निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम गणेशोत्सवावर होण्याची शक्यता वाढली असल्याने गणेश मूर्तिकारांना फटका बसणार की गणेशजी तारूण नेणार. यावर्षी कच्च्या मालाचे दर वाढले असूनही मोठ्या धाडसाने कारागिरांनी मोठ्या प्रमाणात मूर्ती बनविल्या आहेत. मूर्तिकारांनी यासाठी बचतगट, पतसंस्था, बँकांकडून कर्ज घेतले आहे. तरीसुद्धा उत्सवावर परीणामाची शक्यता वाढली आहे.
मागीलवर्षी गणेशमूर्तीच्या मागणीत अचानक वाढ झाल्याने बाजारपेठेत गणेशमुर्तीचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवला होता. त्यामुळे गणेशमूर्तीना मोठ्या प्रमाणात दर वाढवून मिळाला होता. त्याच धर्तीवर यावर्षी गणेशमूर्ती मोठ्या प्रमाणात बनवण्यात आले असल्याचे लक्ष्मण कुंभार व मयुर कुंभार यांनी सांगितले.
तर यावर्षी भांडवल मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून गणेशमूर्ती बनविण्यात आले आहेत. परंतु दुष्काळाच्या छायेमुळे भांडवल वसुल होणे तसेच, कारागिरांना पगार देणेतरी शक्य होईल का नाही याची शंका असल्याचे मूर्तिकार सुरज कुंभार व सचिन कुंभार यांनी सांगितले.
मागील वर्षी पेक्षा यावर्षी पीओपी व रंगाच्या दरात २५ टक्के वाढ झालेली असल्याचे आकाश कुंभार यांनी सांगितले. तर कच्च्या मालाच्या दर वाढीच्या पार्श्वभूमीवर मूर्तीचे दर यावर्षी वाढवावे लागणार असल्याचे क्रांतीवीर कुंभार यांनी सांगितले.
सरकारने पीओपीच्या मूर्ती ऐवजी शाडूच्या मूर्तीच्या विक्रीची अट घातल्याने मूर्तीचे दर वाढणार आहेत. त्यामुळे गणेशमुर्तीची खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार आहे. त्यामुळे शासनाने मूर्तिकार व सर्व सामान्यांचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा. - तुकाराम घोगरे, ग्राहक
फोटो - गणेशवाडी येथील कुंभारवाड्यात गणेशमूर्तीवर अंतिम हात फिरवताना कारागीर मग्न आहेत.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा