Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

राजकारण्यांनो,तुमचं हिंदू -मुस्लिम सुरु राहू द्या...धमाॕच्या भिंती ओलांडून मुस्लिम कुटुंबाने बसवल्या गौराई!

 


अकलुज -----प्रतिनिधी

लक्ष्मीकांत --कुरुडकर

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.7020 665 407

                        जाती धर्माच्या भिंती ओलांडून गौरी-गणपतीची प्रतिष्ठापना केल्याने बारामतीमधील मुस्लिम कुटुंबाचं कौतुक होत आहे. शेख कुटुंब हे गेल्या आठ वर्षापासून गणपतीची प्रतिष्ठापना करत आहे. गणपतीवर त्यांची श्रद्धा आहे. आता यावर्षी शेख कुटुंबाने गौराई बसवल्या आहेत. त्यामुळे परिसरात त्यांचं विशेष कौतुक होतंय. कुठल्याही जाती आणि धर्मामध्ये भेदभाव न करता सर्वांनी एकोप्याने राहावं असा संदेश त्यांनी या माध्यमातून दिला आहे.

बारामतीमधील शेख कुटुंब हे कुठल्याही जाती धर्माच्या भेदभावामध्ये न अडकता हिंदू धर्माचा महत्वाचा सण म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. गेल्या आठ वर्षापासून शेख कुटुंब गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करून मोठ्या श्रद्धेने गणपतीची आराधना करत आहे. यावर्षी गणपती बाप्पाच्या जोडीला गौराई आली असून त्यांनी पहिल्यांदाच गौराई बसवल्या आहेत. त्यामुळे त्यांचा यावर्षीचा गौरी गणपतीच्या सणाचा आनंद द्विगुणित झाला आहे.

गणपती बाप्पाच्या जोडीला गौराईचं आगमन

शेख कुटुंब हे सहा जणांचं... सिकंदर शहाबुद्दीन शेख, आलिमा सिकंदर शेख, कईम सिकंदर शेख आणि मोहम्मद सिकंदर शेख अशी त्यांची नावं. शेख कुटुंबाची गणपतीवर विशेष श्रद्धा असून गेल्या आठ वर्षापासून अविरतपणे त्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होतात. यावर्षी पहिल्यांदाच गौराईंचं त्यांच्या घरी आगमन झालं आहे. २५ वर्षांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील कुर्टी या गावात काम करत असताना त्यांच्या वडिलांना गौराईचे मुखवटे सापडले, तेव्हापासून गौराईची स्थापना त्यांच्या घरी इंदापूर तालुक्यातील जंक्शन गावात होते.

राजकारण्यांनो तुमचं हिंदू मुस्लिम राजकारण चालू राहू द्या...

मुस्लिम समाजात गौराई बसवल्या जात नाहीत. परंतु, गौरी गणपतीवरील निस्वार्थ श्रद्धा असल्याने यावर्षी पहिल्यांदाच शेख कुटुंबाने गौराई बसवल्यात. मुस्लिम धर्माप्रमाणेच शेख कुटुंब हिंदू धर्मातील गौरी- गणपती सणाचा आनंद घेत आहे. एकीकडे अवघ्या देशभरात हिंदू- मुस्लिम असं राजकारण होत असताना शेख कुटुंबाने हिंदू सणांद्वारे हिंदू- मुस्लिम एकतेचा संदेश दिला आहे. आपण सर्व एक आहोत, कुठलाही भेदभाव न करता गुण्यागोविंदाने राहिलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं आहे. अशाच रीतीने हिंदू मुस्लिम एक राहिल्यास एकमेकांच्या जाती- धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा