Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २८ ऑक्टोबर, २०२३

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 मिलेट ऑफ द मंथ-- ऑक्टोबर, भगर (वरई)

 


टाइम्स 45 न्युज मराठी

                                स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सात आपण आंतराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ सर्वत्र विविध कार्यक्रमाने साजरे करत आहोत याचाच एक भाग पौष्टीक तृणधान्य लागवड तंत्रज्ञान त्यांचे अहारातील महत्व , वैदयकिय , प्रक्रिया उदयोग , चा प्रचार प्रसार प्रसिद्धी केली जात आहे. मिलेट ऑफ द मंथ ऑक्टो भगर वरई बाबत जाणून घेऊ या ! उपवासाठी शाबूदाणा ला पर्याय असलेले धार्मिक महत्व असलेले तृणधान्य आहे. १- वरई भगर मध्ये इतर तृणधान्य ची तुलणा करता ३०% जास्त एंटीऑक्सीडंट आहे यामुळे वार्धक्य विरोधी कॅन्सर प्रतिबंध करणे केसाचे व त्वचा आरोग्यास लाभधारक आहे. २ - व्हिटॅमीन बी -३ पॅलेग्रा रोगावर म्हणजेच- सुजलेली त्वचा , अतिसार , स्मृतीभ्रंश , तोड येणे या विकारावर लाभादायक गुणकारी आहे. ३ - सोडीयम च्या अल्प प्रमाणात असलेमुळे रक्ताभिसरण नियमित व रक्तदाब नियंत्रीत ठेवण्यास मदत करते . ४- कॅल्शिअम जास्त प्रमाणात असलेमुळे शरीराचे तपमान नियमित ठेवण्यास आबाल वृद्ध हाडे बळकटीकरणास मदत होते . ५- वरई / भगर मध्ये मॅग्नेशिअम च्या उपलब्ध प्रमाणामुळे रक्तातील साखर नियंत्रीत ठेवणेस मदत होते . ६- भगर ग्युटेन फ्री असल्याने ग्युटेन अॅलर्जी रुग्णांना लाभदायक अन्न आहे. ७ - लो ग्लायसेमिक इंडेक्स मुळे मधूमेह विकृतीच्या लोकांना पोष्टीक अन्न आहे. ८- सुक्ष्म तंतूमय पदार्थ भरपूर असल्यामुळे पचनास हलके , वजन कमी करण्यासाठी लाभदायक यामुळे शरीर हालके व एनर्जीटीक राहण्यास मदत करते . ९- भरपूर प्रमाणात लोह मुळे रक्तवृद्धी , रकत शुद्धीकरण मदत करते . थॉयरॉईड विकाराच रग्न सोडून इतर सर्व आबाल वृद्ध यांना लाभदायक पौष्टीक तृणधान्य आहे. लागवड तंत्रज्ञान - हालक्या मध्यम ते भारी जमिनीवर येणारे ४५ ते १३० दिवसात तयार होणारे व २५ ते २७ सेन्टीग्रेड तपमानात किफायतशीर उत्पन्न देणारे पौष्टीक तृणधान्ये आहे. वरई लागवड पेरणी २५ सेमी वर हेक्टरी १0 किलो बियाणे वापरून ,पुनर्लागवड हेक्टरी ५ किलो बियाणे ची रोपवाटिका करून रोपे १० सेमी झालेवर लागवड २५x१० से.मीवर केली जाते . बियाणे विसकटून फोकून करावयाची असेल तर १५ किलो बियाणे पुरेशे होते . वरई लागवडसाठी फुले एकादशी, के - १ हलकी जमिन व जीपीयुपी -२१ मध्यम जमिनीसाठी वाण उपयुक्त आहेत . आपेक्षीत उत्पनासाठी पेरणी जुलै ते सब्टेबर मध्ये करावी पेरणी पूर्व बियाणेस २ते ३ ग्रॅम थायरम २५ ग्रॅम अझोस्पीरील म किंवा अॅस्परजिलस ची प्रक्रिया केलेस १५ उत्पन्नात वाढ होते . पेरणी वेळी , पूर्न लागवड वेळी २० किलो नत्र ४० किलो पालाश दिल्यास १०% उत्पादनात वाढ होते . या पद्धतीने लागवड केल्यास १०ते १६ क्वि धान्य व ४० क्वि पौष्टीक चारा उत्पादन देणारे पौष्टीक तृणधान्य आहे. तरी याचे उपवासाला फक्त न वापरता आहारातील प्रमाण वाढवून या पौष्टीक तृणधान्य लागवडीस चालना देऊन तृणधान्ये खा व स्वस्थ रहा !!



सतीश कचरे-- मंडळ कृषी अधिकारी ,नातेपूते.

(ISO 9001--2015)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा