Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १६ ऑक्टोबर, २०२३

नरसिंहपूर परिसरात भवानी ज्योतींचे भव्य स्वागत

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

                          - आश्विन शुध्द प्रतिपदेपासून देवीच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ होतो. तर समाप्ती विजयादशमीला दसरा साजरा करुन करण्यात येतो. त्यानिमीत्त आदिशक्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी तुळजापूर, कोल्हापूर, माहुरगड तसेच काळुबाई येथून भवानी ज्योती आणल्या जातात. तसेच घरोघरी घटाची स्थापना आजच्या शुभमुहूर्तानुसार सकाळ पासूनच करण्यात येते. भवानी ज्योतींचे मार्गावरील गावांतून ठिकठिकाणी मोठे उत्साहात स्वागत करण्यात येते. 

   नवरात्रोत्सोव सुमारे तीन हजार वर्षापासून देवीचं नवरात्र करीत असल्याचे अनेक संदर्भ आढळतात. आश्विन महिन्या प्रमाणेच चैत्र महिन्यात देखील देवीचं नवरात्र असून ते चैत्री पोर्णिमेपर्यंत असते. आश्विनातील नवरात्रात दुर्गापूजा केली जाते. ती तेजस्वरुपाची, शक्तीची उपासना आहे. पुजेच्या विविध पध्दती विविध ठिकाणी वेगवेगळ्या आढळतात. या नवरात्राला शारदीय नवरात्र म्हणतात. नवरात्रात देवीजवळ अखंड दिवा लावला जातो. नवरात्र पूजेतील महत्वाचा भाग म्हणजे ही तेलवात नऊ दिवस रात्रंदिवस तेवत राहण्यासाठी विशेष प्रकारे बनवली जाते, त्यालाच भवानीज्योत असे संबोधण्यात येते. 

  आजपासून नवरात्र उत्सवास प्रारंभानिमीत्त गावोगावच्या मंडळाच्या कार्यकत्यांनी विविध ठिकाणी जाऊन भवानी ज्योती मध्यरात्री प्रज्वलीत करुन धावत घेवून येतात. जवळपास १५० ते २०० किलोमीटरचे अंतर मंडळाचे कार्यकर्ते एकमेकांच्या सहाय्याने पळत पुर्ण करतात. तरीसुद्धा आज तुळजापूर, कोल्हापूर, माहुरगड, काळूबाई येथून आलेल्या भवानी ज्योतींचे ठिकठिकाणी महिला तसेच नागरीकांनी उत्साहात स्वागत केले. तुळजापूर येथून आलेल्या भवानी ज्योतींचे नरसिंहपूर, आडोबावस्ती, टणू, पिंपरी बुद्रुक, गणेशवाडी, बावडा गावात भवानी ज्योतींचे ठिकठिकाणी पुजन करण्यात आले.



     भवानी ज्योती प्रत्येक वर्षी ठरल्याप्रमाणे या परिसरातून जात असल्याने नागरीक सकाळपासून त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर थांबले होते. बावडा नरसिंहपूर रस्त्याला कोट्यावधी रुपयांची निधी खर्चून रस्त्याचे काम करण्यात आले आहे. त्यावरून भवानी ज्योती घेऊन अनवाणी पळताना पुर्वी सारखा त्रास होत नाही असे अनेक कार्यकर्ते यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे व दुरदृष्टीच्या अभावाने मार्गावरील धोकादायक वळणे काढली नसल्याने सतत अपघात होवून अनेकांचे बळी गेले आहेत. तर गणेशवाडी येथील पुलाचे काम ठेकेदाराने अर्धवट ठेवल्याची तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आर्थिक साठगाठीतून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी बोलून दाखवला आहे.

फोटो - गणेशवाडी येथे भवानी ज्योतींचे आगमन होताच नागरिकांनी तेल ओतत दर्शन घेतले.

--------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा