Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ६ जानेवारी, २०२४

माळशिरस तालुक्यात एम. आय. डी. सी. होणे- काळाची गरज--- चंद्रशेखर गायकवाड..

 


टाइम्स 45 न्युज मराठी

मो.9730 867 448

              तात्कालिक मुख्यमंत्री स्वर्गिय यशवंतराव चव्हाण आणि अर्थमंत्री दिवंगत एस जी बर्वे यांनी

" mid कायदा"1961 ला लागू केला आणि 1 आँगस्ट 1962 रोजी

"महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची "उभारणी केली.

      स्वर्गिय यशवंतराव चव्हाणांच्या दूरदुष्टीकोनातून उभारलेली midc ने महाराष्ट्रात आज चांगलीच झेप घेतलेली आहे.

     महाराष्ट्रात 66273.82 हेक्टर जमिनीसह 289 औद्योगिक क्षेत्रे बांधली.

    माळशिरस तालुक्याच्या जवळ असणाऱ्या कुरकुंभ midc विचार केला तर

मोती पाँलिमर

हैकेल समुह

तारिणी स्टील 

अल्काइल एमाइन्स केमिकल लिमिटेड

हाई इची कारकरिया लिमिटेड

एक्सप्लिसिट केमिकल्स प्राईवेट लिमिटेड

    असे अनेक उद्योगात 

दौड तालुक्यातील हजारो

बंधू - भगिनींच्या हाताला काम मिळाले.

     चाकण सारख्या midc मध्ये 

फाँक्सवँगन

बजाज आँटो

मर्सिडीज क्रेझ

महिंद्रा आणि महिंद्रा

ह्युंदाई 

    अशा अनेक प्रोजेक्टमध्ये हजारो काम करतायत.



     महाराष्ट्रात आज

पुणे,रांजणगाव,चाकण,हिंजवडी,तळेगाव औद्योगिक विकास महामंडळात लाखो कुटुंबांचा आर्थिकदृष्ट्या दर्जा निश्चित सुधारलेला आहे.

      औद्योगिक विकास महामंडळ हि महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत नोडल इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सी आहे.

ती व्यवसायांना 

1)जमिन

2)रस्ते 

3)पाणीपुरवठा 

4)ड्रेनेज सुविधा

5)पथदिवे

     इत्यादी पायाभूत सुविधा पुरविते.

    औद्योगिक विकास महामंडळाचे महत्त्व 

1)तांत्रिक नवकल्पनांचा उदय होऊन तालुक्यात युवाशक्तीतून उद्योजक उभारतील

2)कुशल अकुशल युवक युवतींना काम मिळेल

3)बेकारीवर मात करता येईल

4)जिवनात स्थिरता येईल(शहराकडे वाढणारी गर्दी कमी होईल)

5)आर्थिकदृष्ट्या मोबदला सरासरीपेक्षा जास्तच राहिल.


      औद्योगिक विकास महामंडळासाठी गरज असते ती

"पडिक जमिनीची"

जी काळीभोर जमिन

इथून पुढे हजारो वर्षे 

पीक देणार आहे,अशा सुपीक जमिनीत परवानगी मिळणे फार कठीण असते .


    सोलापूर जिल्ह्यात टेंभूर्णी,कुर्डवाडी,चिंचोलीमंगळवेढा,सोलापूर (अक्कलकोट रोड)

पाच एम आय डि सी आहेत.

  बार्शी,करमाळा ,पंढरपूर 

तालुक्यात सुध्दा निर्माण

होण्याच्या मार्गावर आहेत.

    हा फक्त लेख नसून

तालुक्यातील युवक -युवतींच एक स्वप्न आहे.

राजकीय ,सामाजिक 

क्षेत्रातील प्रत्येकांनी 

याची दखल घ्यावी नम्रपणे विनंती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा