Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २९ जानेवारी, २०२४

*देशाच्या पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी -राहुल नार्वेकरांची -नेमणूक हे देशातील लोकशाही संपविण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल मानायचे का?* *शिवसेना पक्षप्रमुख -"उद्धव ठाकरे" यांचा सवाल*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448*

          महाराष्ट्रात नुकताच परिशिष्ट दहाच्या चिंधड्या उडवून जो उफराटा निर्णय नार्वेकरांनी दिला त्याचे वस्त्रहरण आम्ही जनतेच्या न्यायालयात तर केलेच, परंतु त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयातही गेलो आहोत. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना ही नेमणूक करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयावर दडपण आणण्याचाच प्रयत्न समजावा लागेल.

 आम्ही सर्वोच्च न्यायालयाहून मोठे आहोत, आम्ही म्हणू तेच संविधान आणि म्हणू तोच कायदा यापुढे देशात असेल असे म्हणणारे कोणीही असले तरी त्याला डॅाक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची आणि लोकशाहीची ताकद दाखवावीच लागेल. अन्यथा देशात लोकशाहीची हत्या होऊन बेबंदशाही येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा