*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे खासदार डॉ.मनमोहन सिंग राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत. यापुढे संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत ते दिसणार नाहीत. 33 वर्षांनी ते निवृत्त होत आहेत. तर पक्षाच्या माजी प्रमुख सोनिया गांधी पहिल्यांदाच संसदेच्या वरिष्ठ सभागृहात प्रवेश करतील. डॉ.मनमोहन सिंग यांच्या निवृत्तीनिमित्त काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक भावनिक पत्र लिहिले आहे.
मनमोहन सिंह यांचा आवाज देशातील जनतेसाठी बुलंद होत राहणार. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रात लिहिले आहे की, ‘तीन दशकांहून अधिक काळ सेवा केल्यानंतर आज तुम्ही राज्यसभेतून निवृत्त होत आहात, आज एका युगाचा अंत झाला आहे. तुमच्यापेक्षा जास्त समर्पणाने आणि निष्ठेने त्यांनी देशाची सेवा केली असे फार कमी लोक म्हणू शकतात.’
‘देशासाठी आणि जनतेसाठी तुमच्या इतके काम फार कमी लोकांनी केले आहे. तुमच्या मंत्रिमंडळाचा भाग असणे हा माझ्यासाठी वैयक्तिक विशेषाधिकार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये तुमची प्रकृती स्थिर नसतानाही तुम्ही नेहमीच काँग्रेस पक्षासाठी जेव्हा गरज पडेल तेव्हा उभे राहिला आहेत, त्यासाठी पक्ष आणि मी सदैव तुमचा ऋणी राहील.’
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि नऊ केंद्रीय मंत्र्यांसह राज्यसभेचे किमान 54 सदस्य मंगळवार आणि बुधवारी निवृत्त होणार आहेत आणि काही वरिष्ठ सभागृहात परतणार नाहीत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला, माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि राज्यमंत्री माहिती आणि प्रसारण एल. मुरुगन यांचा मंगळवारी राज्यसभेतील कार्यकाळ संपला आहे.
तर केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा कार्यकाळ बुधवारी संपणार आहे. यातील केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि एल मुरुगन यांना राज्यसभेत आणखी एक कार्यकाळ देण्यात आला आहे.
वरिष्ठ सभागृहातील 49 सदस्य मंगळवारी (2 एप्रिल) निवृत्त झाले, तर पाच जण बुधवारी (3 एप्रिल) निवृत्त होणार आहेत. बुधवारी आणखी पाच जण निवृत्त होणार आहेत. अशा प्रकारे एकूण 54 खासदार निवृत्त होत आहेत. यामध्ये समाजवादी पक्षाच्या जया बच्चन यांचाही समावेश आहे. मात्र त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे.
1991 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेत
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे 1991 मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभेत पोहोचले. पीव्ही नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये त्यांनी वित्त मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली. त्यांनी अर्थव्यवस्थेशी संबंधित अनेक मोठे निर्णय घेतले. यानंतर मनमोहन सिंह 2004 ते 2014 पर्यंत भारताचे पंतप्रधान होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा