Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १५ मे, २०२४

*मोदीच्या डोक्यावर प्रफुल्ल पटेलांनी "जिरेटोप" चढवला हा महाराष्ट्राचा अपमान-- 'शिवप्रेमी' मध्ये सर्वत्र संतापाची लाट..*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448


मुंबई :--छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेशी घट्ट बांधल्या गेलेला जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी चढवला आहे. संबंधित छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. तसेच विरोधकांनीही प्रफुल पटेल यांच्या या कृतीवरुन टीकेची झोड उठवली आहे.

शिवाजी महाराज यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक गोष्टीबाबत शिवप्रेमी आणि सामान्य नागरिक अत्यंत दक्ष असतात. जिरेटोप हा शिवाजी महाराज यांच्या पेहरावाचा भाग होता. त्यामुळे शिवप्रेमींच्या मनात जिरेटोप म्हणजे शिवराय, असे पक्के समीकरण आहे. त्यामुळेच प्रफुल पटेल यांनी हा जिरेटोप मोदींच्या डोक्यावर चढवण्याची कृती टीकेच्या भोवऱ्यात सापडली आहे. जिरेटोप हे हातात देऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो. परंतु अजित पवार गटाचे प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केला आहे. महायुती दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचार झाली आहे की, महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचं काम या नेत्यांकडून होतंय. महाराजांचा अवमान करणा-या या महायुतीला, भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही, अशी टीका शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे.

वाराणसीमध्ये प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरेटोप घातला. मोदी काय छत्रपती झाले आहेत का? हा महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे आपण बदला घ्यायचा, अशी आक्रमक भूमिका संजय राऊत यांनी घेतली आहे.



दरम्यान, टीकेची झोड उठल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाकडून सारवासारव करण्यात आली. 'यात मोदींचा दोष नाही', असा बचाव करण्यात आला. असा प्रकार होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. कोणाला मोदींना जिरेटोप घातल्याचा अपमान वाटत असेल तर पुन्हा तसे घडणार नाही. कधी कोणी कोणाला काय घातलं? यात मोदीजींचा काय दोष? यावर पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणं योग्य होणार नाही. याचा तपास केला पाहिजे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आळंदीत आले होते तेव्हादेखील जिरेटोपाच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण झाला होता. त्यावेळी योगींचा सत्कार करताना त्यांच्या डोक्यावरही जिरेटोप चढवण्यात आला होता. यावरुन प्रचंड वाद झाला होता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा