इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
--- उजनी व वीर धरण परिसरात होत असलेल्या पावसामुळे नीरा व भिमा नद्यांमध्ये पाणी सोडले जात असल्याने नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.
नीरा नरसिंहपूर येथील नीरा व भिमा नद्यांच्या संगमावर उजनी व वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे संभाव्य उद्भवणाऱ्या परस्थितीची पाहणी व आढावा प्रसंगी आमदार दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील, श्रीमंत ढोले, हनुमंत कोकाटे, श्रीकांत दंडवते, सरपंच अर्चना सरवदे, नितीन सरवदे, दशरथ राऊत, नरहरी काळे, दादासाहेब क्षिरसागर, अरूण क्षिरसागर, मंडलाधिकारी मल्लाप्पा ढाणे, तलाटी शिवाजी बिराजदार, सुरज पाटमास आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार भरणे पुढे म्हणाले, पुणे परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने वरील धरणे भरून वाहू लागली आहेत. त्यामुळे उजनी धरणाच्या पाण्यात वाढ होऊ लागली आहे. तर वीर धरण परिसरात पावसाचा जोर असून धरण भरल्याने नीरा नदीत पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नीरा व भिमा नद्यांच्या काठावरील गावात संभाव्य पुरपरस्थिती ओढवली तर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सुचना देण्यात आले आहेत. प्रशासनाने परस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तहसीलदार श्रीकांत पाटील म्हणाले, वीर धरणातून नीरा नदीत ६५ हजार तर उजनी धरणातून भिमा नदीत ६१ हजार क्युसेक्सचा विसर्ग सोडला जात असून दौंड येथून एक लाख साठ हजार क्युसेक्सचा विसर्ग उजनीत येवून मिसळत आहे. संभाव्य परस्थिती पाहून पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नीरा व भिमा नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आले आहेत. नरसिंहपूर येथील पुरबाधीत कुटुंबाना श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर, भक्तनिवास, नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व पोलीस स्टेशन इमारतीत स्थलांतरित करण्यासाठी पाहणी करण्यात आली आहे. पोलीस, आरोग्य विभाग व आमचा महसूल विभाग कर्मचाऱ्यांना सावधानतेच्या सुचना देण्यात आले आहेत.
फोटो - नीरा नरसिंहपूर येथील नीरा व भिमा नद्यांच्या संगमावर पाण्याची पाहणी करताना आमदार दत्तात्रय भरणे, तहसीलदार श्रीकांत पाटील व मान्यवर मंडळी.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा