*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
धाराशिवच्या 'आक्का' निवासी उपजिल्हाधिकारी "शोभा जाधव" यांच्या भ्रष्टाचाराची खुली चौकशी करण्यासाठी त्यांना तात्काळ निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी तुळजापूर येथील "अमोल शिवाजीराव जाधव" यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारी अर्ज देऊन केली असून या तक्रारी अर्जामध्ये खालील तक्रारी नमूद आहेत.
1. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच आदरणीय संतोष देशमुख यांची पवनचक्की च्या अर्थकारणातून हत्या झाल्याने पूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला आहे. तसाच काहीसा प्रकार धाराशिव जिल्ह्यात सुरू आहे.
2. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावातील सरपंचाचे वाहन पवन चक्की च्या ठेकेदार आणि गुंडांनी पेटवून देण्याचा प्रयत्न केला.
3. बीड जिल्ह्यामध्ये सर्व घटनांचा सूत्रधार हा कोणी आका आहे मात्र धाराशिव मध्ये आमची 'आक्का' म्हणजेच निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव हीच मुख्य सूत्रधार आहे.
4. धाराशिव जिल्ह्यात पवनचक्कीच्या 11 कंपन्यांनी कार्यरत आहेत. त्या कंपन्याचे अधिकारी हे डायरेक्ट धाराशिवच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना हप्ता देतात
5. पवनचक्की उभी करताना शेतजमिनीचा औद्योगिक अकृषक परवाना लागतो तो परवाना देताना निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव ह्या सर्व नियम धाब्यावर बसवून लाखोंची लाच घेऊन नियम बाय परवाना देतात
6. जिल्ह्यात पवनचक्कीचे ठेकेदार मोठ्या प्रमाणात मुरूमाचे उत्खनन करतात अशावेळी एखाद्या अधिकारी गौण खनिजावर कारवाई करायला गेल्यास त्याला निवासी उपजिल्हाधिकारी बोलावून घेतात आणि त्याला समजावून सांगतात की हा शासनाचा महत्त्वाचा प्रकल्प आहे हे नियमित जिल्हा अधिकारी कार्यालयाला गौणखणीजाचा पैसा भरत असतात त्यामुळे पवनचक्की वाल्यांवर कारवाई करून त्यांना त्रास देऊ नका अन्यथा मला तुमच्यावर कारवाई करावी लागेल अशा स्वरूपाच्या गुंडांना लाजवेल अशा धमक्या देत असतात
7. शोभा जाधव ह्या जिल्ह्याच्या अप्पर जिल्हा दंडाधिकारी या नात्याने जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनवर नियंत्रण मिळवून आहेत कुठेही कुठल्याही कंपनी किंवा कंपनीचा ठेकेदारांना काहीही अडचण आल्यास निवासी उपजिल्हा अधिकारी या डायरेक्ट पोलीस स्टेशनच्या पोलिस अधिकाऱ्याला बोलावून पवनचक्की कंपनी वाल्यांना मदत करण्याचे आदेश देतात
8. त्यामुळे कंपनीचे ठेकेदार आणि त्यांनी पोहोचलेल्या गुंडांना प्रशासनातील एवढ्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा वरदहस्त असल्यामुळे ते शेतकऱ्यांना पिळू पिळू घेत आहेत आणि जो कोणी त्यांच्या विरोधात आवाज उठवेल त्याला सिनेमात लाजवेल अशा स्टाईलने दहा दहा काळ्या स्कार्पिओ मध्ये येऊन धमक्या देऊन मारहाण करण्याचे काम सुरू आहे
9. याच शोभा जाधव यापूर्वी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे उपविभागीय अधिकारी होत्या तेथे त्यांनी तलाठ्यांची एक कार्यशाळा घेतली आणि त्या कार्यशाळेमध्ये तलाठ्यांनी लाच कशी घ्यावी याचे प्रशिक्षण दिले ती कार्यशाळा महाराष्ट्र भर गाजत आहे
10. तसेच त्या कळंब येथे तहसीलदार असताना गोरगरीबांच्या अन्नात त्यांनी माती कालवली होती त्यांनी गोरगरिबांचे गहू तांदूळ यामध्ये घोटाळा केला होता त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झाला होता
11. उमरगा येथे असताना त्यांनी शासकीय जमीन खाजगी व्यक्तीला विकली होती त्यामध्ये त्या निलंबित सुद्धा झाल्या होत्या
12. लातूर येथे असताना त्यांच्या संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुद्धा सुरू आहे
13. बीडमध्ये असताना त्यांनी निवडणुकीच्या कामात भ्रष्टाचार केल्यामुळे त्यांची निवडणुकीची विभागीय चौकशी सुद्धा सुरू आहे तरीसुद्धा धाराशिव चे जिल्हाधिकारी "सचिन ओंबासे" यांनी निवडणूक आयोगाला ना हरकत प्रमाणपत्र देऊन अशा भ्रष्ट मॅडमला R D C बनवलं
14. धाराशिव येथे निवासी उपजिल्हा अधिकारी म्हणून आल्यापासून त्यांनी करोडोंची माया जमा केली असून कर्मचाऱ्यांच्या बदल्या तलाठ्यांच्या बदल्या प्रतीनियुक्त यामध्ये 25 हजारापासून ते एक लाख रुपये पर्यंत चा रेट आहे
15. फटाका परवाना 50 हजार रुपये घेतल्याशिवाय देत नाहीत यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे
16. बंदुकीचे लायसन देताना सुद्धा प्रत्येक फाईल मध्ये एक लाख रुपये घेतल्याशिवाय फाईल मंजूर झाल्यावर सुद्धा ऑनलाईन करत नाहीत
17. निवासी उपजिल्हाधिकारी या पदाला वाहन देय नसताना सुद्धा गौण खनिज मधून खाजगी गाडी लावून त्यास गाडीने धाराशिव येथून सोलापूर आणि लातूर या त्यांच्या स्वतःच्या घरी जातात
असे असंख्य भ्रष्टाचार करण्याचे नवनवीन स्रोत त्यांनी शोधले आहे
तरी धाराशिव चा बीड होऊ नये यासाठी आमच्या जिल्ह्याच्या" आक्का "असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांना तात्काळ निलंबित करा आणि त्यांनी जमा केलेल्या संपत्तीची फौजदारी गुन्हा दाखल करून खुली चौकशी करावी अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असाही इशारा मुख्यमंत्र्यांना दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे
माहितीस्तव:-
मा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मा. मुख्य सचिव सुजाता सैनिक
मा. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला
मा. महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग -संजीव कुमार सिंगल
मा. विभागीय आयुक्त गावडे छत्रपती संभाजीनगर
मा. जिल्हाधिकारी धाराशिव मैनक घोष
आदींना तक्रारी अर्जाची प्रत पाठवण्यात आली आहे
*"अमोल शिवाजीराव जाधव" मं कावती गल्ली- तुळजापूर जि. धाराशिव*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा