Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १६ मार्च, २०२५

*शेतकरी संघर्ष समिती राष्ट्रीय महामार्ग 652 नळदुर्ग अक्कलकोट छत्रपती संभाजी नगर खंडपीठाच्या आदेशाचा पालन न केल्या स शेतकरी आक्रमक मुंबई येथील नरिमन पॉईंट समुद्रात 28 /3 /2025 रोजी जलसमाधी आंदोलना च्या भूमिकेवर शेतकऱी ठाम!...*

 


*नळदुर्ग --प्रतिनिधी*

*रहेमान- शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५२ नळदुर्ग-अक्कलकोट मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठाच्या आदेशाचा अवमान करुन अर्टिकल 300A चे उल्लंघन करुन Private Property is Fundamental Rights Suprime Coart सर्वोच्च न्यायालयाचा आदेशाचा अवमान करीत शेतकऱ्यांनवरती पोलीस बळाचा वापर करुन त्यांच्या मालकी हक्काच्या जमीनी संयुक्त मोजणी अहवालामध्ये बाधित झालेल्या असाताना शेतकऱ्यांन मध्ये मितीचे वातावरण निर्माण करुन मा. संतोष राऊत (उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी धाराशिव) मा. एस.एन. शेळके (कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापूर), मा. संतोष देशमुख (उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर), मा. अरविंद बोळंगे (तहसिलदार तुळजापूर), मा. गजेंद्र सरोदे (तात्कालीन पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, नळदुर्ग), व एन.डी. राजगुरु (कनिष्ठ अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग सोलापूर) यांनी संगनमाताने अचानकपणे पोलीस बळाचा वापर करुन शेतकऱ्यांनमध्ये भिती निर्माण करुन दि. ०७/०२/२०२५ रोजी मौजे गुळहळ्ळी ता. तुळजापूर येथील रस्त्याच्या कामासाठी मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठाच्या दि. ०४/०२/२०२५ रोजीच्या आदेशात कोणत्याही प्रकारच्या कामासाठी परवानगी नसताना समस्त अधिकाऱ्यांनी मिळून पोलीस बळाचा वापर करुन शेतकऱ्यांनमध्ये भितीचे वातावरण निर्माण केले या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबीत करावे अन्यथा दि. २८/०३/२०२५ वार शुक्रवार रोजी निवेदना वरती स्वाक्षरी केलेले शेतकऱ्यान वरील अन्याया विरोधात "नरीमन पॉईंट" मुंबई येथील समुद्रात सकाळी ११ वा. जलसमाधी आंदोलन करणार असले बाबत. शेतकऱ्यांची भूमिका ठाम असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा