Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १९ एप्रिल, २०२५

*"शिवराज्य पत्र"चे संपादक आणि ज्येष्ठ 'पत्रकार- इकबाल शेख' यांना पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय 'आदर्श पत्रकार पुरस्कार 'जाहीर..*

 


*सोलापूर ---प्रतिनिधी*

*आंबिद. बागवान*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी

गेल्या आठ वर्षापासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र वतीने महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या संदर्भात वेगवेगळे स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना आरोग्य योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांबाबत स्वतंत्र सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी राज्यातील यूट्यूब व पोर्टलला शासकीय मान्यता राज्यातील वृत्तपत्राच्या ज्येष्ठ संपादकांना दरमहा 20 हजार रुपये पेन्शन यासह राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाणबाबत पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे त्याच बरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीनां पत्रकार सुरक्षा समिती वतीने त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून दरवर्षी विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन सत्कार केला जातोय पत्रकार सुरक्षा समिती चा राज्यस्तरीय पुरस्कार 2025 चा आदर्श पत्रकार पुरस्कार 


 शिवराज्य पत्र चे संपादक इकबाल शेख यांना जाहीर केल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली आहे.


शिवराज्य पत्र चे संपादक इकबाल शेख यांचा परिचय

जेष्ठ पत्रकार इकबाल शेख हे कासेगाव ता दक्षिण सोलापूर येथील रहिवाशी असून असून ते अतिशय शांत संयमी व मराठी भाषेवर प्रभुत्व असलेले व्यक्तीमत्व असून विविध दैनिकात काम केल्याने त्यांना पत्रकारितेचा गाढा अभ्यास असल्याने ते

 पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून समाजातील वंचित पीडित घटकाच्या न्यायहक्कासाठी शिवराज्य पत्र च्या माध्यमातून संपादक इकबाल शेख यांनी प्रशासन दरबारात आवाज काढून अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांच्या मूलभूत हक्कासाठी आवाज उठवला असून शिवराज्य पत्र च्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक राजकीय घडामोडीचा वेगवान आढावा घेऊन समाजासमोर जेष्ठ पत्रकार इकबाल शेख यांनी एक नवा आदर्श निर्माण केला असून पत्रकारिता हे केवळ जगण्याचे साधन नसून ती एक सामाजिक बांधिलकी असून पत्रकार हा 

समाजाचा आरसा असतो शिवराज्य पत्राच्या बातमीची दखल घेऊन अनेकांना न्याय मिळाला असून जेष्ठ पत्रकार इकबाल शेख यांच्या पत्रकारीतेची दखल घेऊन इकबाल शेख यांना पत्रकार सुरक्षा समिती मानाचा राज्यस्तरीय 2025 चा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.जेष्ठ पत्रकार इकबाल शेख यांना पत्रकार सुरक्षा समिती चा 2025 राज्यस्तरीय आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार जाहीर झाल्याने पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून जेष्ठ पत्रकार इकबाल शेख यांचे सर्वत्र कौतुक होत असून तांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा