Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १२ जानेवारी, २०२६

*संग्राम नगरमध्ये मासाहेब जिजाऊ यांच्या जयंती निमित्त ‘जिजाऊ नगर’ कॉलनीचे भव्य उद्घाटन*

 *अकलूज ---प्रतिनिधी*

    *एहसान.   मुलाणी*

   *टाइम्स 45 न्यूज मराठी*


अकलूज : संग्रामनगर येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या कॉलनीस ‘जिजाऊ नगर’ असे नामकरण करण्यात आले. या कॉलनीचे उद्घाटन अकलूज नगर परिषदेचे नगरसेवक  सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले.

जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व जिजाऊ वंदनेने करण्यात आली. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्यावर प्रेरणादायी भाषणे झाली. 

जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे विभागीय अध्यक्ष प्रा. डॉ. मिनाक्षी अमोल जगदाळे यांनी जिजाऊंच्या विचारांचा व समाजघडणीत त्यांच्या योगदानाचा सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी त्या म्हणाल्या ,

जिजाऊ नगर हे नाव केवळ एका कॉलनीचे नसून प्रेरणादायी विचारांचे प्रतीक आहे.

राजमाता जिजाऊ यांनी दिलेले संस्कार, धैर्य आणि राष्ट्रभक्तीची शिकवण या नावातून प्रतिबिंबित होते.

या नावामुळे इतिहासाची आठवण कायम जिवंत राहते.

जिजाऊ नगर हे नाव महिलांच्या सन्मानाचे व सक्षमीकरणाचे प्रतीक आहे.





समाजात नैतिक मूल्ये रुजवण्याचा संदेश या नावातून मिळतो.

भावी पिढीला आदर्श जीवनमूल्यांची ओळख करून देणारे हे नाव आहे.

जिजाऊ नगरमुळे परिसराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख प्राप्त झाली आहे.

हे नाव निवडणे म्हणजे महान परंपरेला मानवंदना देणे होय.

जिजाऊंच्या विचारांप्रमाणे संस्कारक्षम आणि सुसंस्कृत समाज घडावा, हीच अपेक्षा आहे.

जिजाऊ नगर हे नाव सदैव अभिमानाने उच्चारले जाईल, असे नाव आहे.

तसेच संग्राम नगर ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय श्री. अजित रेवंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.जिजाऊंच्या जीवनावर विचार व्यक्त केले, ग्रामपंचायतीविषयी माहिती दिली आणि कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या 

या कार्यक्रमास संग्राम नगरचे सरपंच . अजित रेवंडे, उपसरपंच . राचकर , प्रहार संघटनेचे संपर्कप्रमुख   अमोल शिवाजी जगदाळे, युवासेना जिल्हाध्यक्ष  गणेश इंगळे,  सचिन गायकवाड, चि समर्थ जगदाळे, राजू सोनवणे,  अनिल कदम,  माने साहेब, शहाजी वाघ, डॉ. संतोष काटकर, डॉ. मंगेश शिंदे, डॉ. विशाल साळुंखे,  अभिजीत वाघ, आकाश मुंजाळ,  गणेश कदम,  सचिन लोखंडे,  खाडे, सतीश रेवंडे, बबन शेंडगे, सचिन रेवंडे,  हनुमंत रेवंडे, गुणवंत अंधारे,  सुमंत अंधारे, राजेश कांबळे  सावंत साहेब, जाधव ,शकील भाई दस्तगीर, जिजाऊ ब्रिगेड उपाध्यक्ष सुषमा पाटील,. पल्लवी काटकर,  विद्या मुंगुसकर ,  विद्या साळुंखे, मनीषा कदम, विनोदिनी अंधारे . वाघ,  उज्वला आडणे, रेशमा ननवरे, देशमुख आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अमोलशेठ जगदाळे व आभार प्रदर्शन श्री राजू सोनवणे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा