Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २९ जानेवारी, २०२६

*माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जांभूड गणा तील "स्वाभिमान शेतकरी संघटनेचे उमेदवार- सिराज नुरालाल तांबोळी ,यांना विजयी करण्याचे आवाहन*

 अकलूज. प्रतिनिधी 

टाइम्स 45 न्यूज मराठी 



83 जांबुड पंचायत समिती माळशिरस सार्वत्रिक निवडणूक 2026 स्वाभिमान शेतकरी संघटना, क्रांतिकारी शेतकरी संघटना प्रहार शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, पुरस्कृत अधिकृत अपक्ष उमेदवार शिराज नुरलाल तांबोळी यांचे चिन्ह ऊस आहे त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष व  माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली असून शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळावा ऊसाला दर मिळाला   असुन


                                                                 शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख शिराज नुरला तांबोळी हे 83 जांभुळगण माळशिरस पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे आहेत त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असेही आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे


 शेतकऱ्यांसाठी उसाचे आंदोलन करून टनाला 300 प्रमाणे कारखाना प्रशासनास   वाढीव दर देण्यास भाग पाडले  या माध्यमातून शेतकऱ्यांना 400 ते 450 कोटी रुपये शेतकरी संघटनेने आंदोलन करून  मिळवून देण्यात आले       


                     माळशिरस तालुक्यातील किमान 100 जणांना घरकुल मिळवून देण्याचे काम या संघटनेच्या माध्यमातून माळशिरस पंचायत समिती आंदोलन करून  घरकुल चा प्रश्न मिटवला शेतकऱ्यांसाठी पिक विमा नुकसान भरपाई दुष्काळ निधी ही मंजूर करून घेतली केळीच्या बोगस रोपे देणाऱ्या कंपन्यांवरती कलेक्टर व जिल्हा कृषी अधिकारी बोगस केळीचे रोपे देणाऱ्या कंपन्यांवरती गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले आणि              


              शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्याचे काम करण्यात आले कलेक्टर व जिल्हा कृषी अधिकारी यांना 24 तासाच्या आत कारवाई करण्यास भाग पाडले  सर्वसामान्य रुग्णांसाठी रुग्णालयाचा  40 ते 50 लाखाचे ऑपरेशन करिता लागणारा खर्च  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून  पाठपुरावा करून मोफत करून देण्यात आले.          



                                                     पंचायत समिती जांभूड गणा मधील दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना एक  तलाठी कार्यालय जांभूड मध्ये आणता आलेले नाही  जांभूळ मध्ये तलाठी कार्यालय नसल्यामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होत आहे श्रीपुर या ठिकाणी जावे लागत आहे आपण तातडीने जांभूड या ठिकाणी तलाठी कार्यालय उपलब्ध करून देण्याचे काम करणार आहे शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्याच्या  सेवेसाठी 24 तास सेवा करण्याच्या मैदानात उतरणार म्हणून आपले कामे होत आहेत.                   



 शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने करून न्याय मिळवून देण्याचे काम केले असून सर्वसामान्यांसाठी कधीही कुठल्याही कामात अग्रेसर व्यक्तिमत्व असणाऱ्या उमेदवार-" सिराज नुरालाल तांबोळी" यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असेही आवाहन करण्यात आले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा