*डॉ. सलीम शाईदा सिकंदर शेख*.
*श्रीरामपूर*.
*९२७१६४००१४*,
इस्लाम हा अरबी शब्द मूळ अर्थ " शांती ' असा होतो." शांतीच्या मार्गावर चालणारा " धर्म ", त्या शब्दांचा " इमान" शब्ध वापरण्यात आलेला त्याचा अर्थ ही " शांती "च होतो .
भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री स्वर्गीय सुषमा स्वराज युनोच्या संमेलनांमधे सहभागासाठी गेल्या होत्या .त्या वेळेस आपल्या शेजारील राष्ट्राला व सर्व जगातील नेत्यांसमोर खडे बोल सुनावले , इस्लाम चा हिंदी भाषेमधील अर्थ पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना आपल्या ओघवत्या शैलीत सुनावले की " इस्लाम शब्दाचा अर्थ शांती होता है " शांती " और अंग्रेजी पीसफूल होता है , आपको पता है , और याद भी होना चाहिऐ " असे बोलून भाषणाची सुरुवात केली होती.
इस्लाम लोकांना अल्लाह (ईश्वरा) चे भय बाळगण्याचे आणि समर्पण करण्याचा आदेश देतो. दबाव ,दडपणाखाली , दुसऱ्या माणसाकडे शरणागती कधीही ही इस्लामला मान्य नाही धमक्या दहशत इस्लामच्या मूळ उद्देश आत्म्याशी बिलकुल विसंगत आहे .
ईसलाम चे सामाजिक मूल्य असे की आपल्यासमोर कोणीहीं दिसताच, त्याला अदरयुक्त मनाने "" " अस्सलामु आलैकुम व रहमतुल्ला व बरकातहु "' म्हणून प्रत्येक मुस्लिम बांधव एकमेकांना आदराने दुश्मनलाही नमस्कार घालतात याचा अर्थ असा होतो " तुमच्यावर आल्लाहाची शांती असो , कृपादृष्टी व दया असो बरकत असो " या वाणीत किती जिव्हाळा , विश्वास , प्रेम भावना आधारित नमस्काराची परंपरा इस्लामने दिली आहे. नंतर लागलीचच उत्तरादाखल समोरील बांधव त्या प्रश्न कर्त्यास प्रेमपुर्वक आदरयुक्त उत्तर देतो की , " वालेकुमसस्सलाम व रहमतुल्ला व बरकातहु " याचा अर्थ तसाच ," माझ्याप्रमाणे तुझ्यावरही आल्लाहाची शांती व कृपादृष्टी असू दे व बरकात आसो."' या उत्तराने समोरच्या मनाला किती प्रेम ,वात्सल्य , मनाला किती गोड वाटत असेल . समोरचा माणूस आपलें हीं चांगलेच चिंतित आहेत. आपुलकीने मिळालेल्या उत्तराने किती हायसे वाटत असणार , मग तो कितीही मोठा मनुष्य असो , गरीब, भिकारी नोकरचाकर मालक असो किंवा एक गुन्हेगार असो , मित्रांनो तुमच्या किती सात जन्माचा दुश्मन असो तो तुम्हाला अशाच प्रकारे सलाम करणार आणि उत्तर हीं याचप्रकारे देणार . किती प्रेमाची भावना इस्लामने जगाला दिली आहे ..प्रेषित हजरत मुहम्मद सल्ल. सांगितले आहे " कोणी उच्च नाही , कोणी श्रेष्ठ नाही ,कोणी मालक नाही , कोणी काळा नाही , कुणी गोरा नाही सर्व समान ऐक आल्लाहाचे लेकरे आहोत. हीच समतेची शिकवण प्रेषीत मुहम्मद स्व. नीं आचरनातुन , कृतीतुन जगाला पाहवयास मिळालं .
खास विशेष तुमचा मित्र , नातेवाईक जवळचा मित्र कोणी खूप दिवसांनी आला तर त्याचे स्वागत एकमेकास आलिंगन देऊन गळे भेटतात, यामुळे एकमेकांच्या हृदयात मनात , मना मध्ये मिसळले जातात व विरोध नाहीसा होऊन कट्टर दुश्मन असेल तर समेट घडवून आणला जातो त्यावेळेस एकमेकांची गळाभेट होऊनच आपला दुश्मनी संपवतात .
प्रेषीत मुहम्मद स्व. सांगितले ," तुम्ही तीन दिवसांपेक्षा जास्त काळ अबोल राहता कामा नये नाहीतर तुम्ही मुसलमानच नाही ,."
प्रेषित मुहम्मद स्व, सांगतात, " तुम्ही एकमेकांत समेट घडवून आणा आणि हेच अल्लाह (भगवंत ) ला समेट घडवून आणणारे जास्त प्रिय आहेत "
शांती , स्नेहभाव, परोपकार , प्रेम आणि करुणा ,सहानुभूती श्रद्धावंताची यांची खास वैशिष्ट्ये असतात .
प्रेषीत मुहम्मद स्व. म्हणतात ," अल्लाह (ईश्वर र) ने. जगातील लोकांना वरदान व आशीर्वाद म्हणून तुम्हाला ( पैगंबर मुहम्मद स्व ) ला जगात शांती व समेट कायम करण्यासाठीच पाठवले आहेत ." ( सुराहा अल-आंबिया अ.१०७).
पुन्हा प्रेषीत मुहम्मद स्व.म्हणतात " सर्व प्राणीमात्र हीं एकाच ईश्वराची लेकरे आहेत म्हणून त्याने निर्माण केलेल्या मानवाशी प्रेम करतो सर्व मानवजातीस सामाजिक न्याय देतो याकडे त्यांचा कटाक्ष असतो , आणि अल्लाह (ईश्वर) काही देण्यात जाती पाती ,वर्ग कसलाही भेदभाव करीत नाही आपण जर एखादे पुण्य चं काम केले असेल , तर ते कणभरही वाया जात नाही ."
दिव्य कुरआनमध्ये म्हणतात की ,"ज्याने अनुरेणू इतके सत्कर्म केले असेल त्याचे फळ त्याला अवश्य तितकेच मिळेल ; आणि, ज्याने इतके दुष्कर्म ,कुकर्म ,वाईट कर्म त्याचे फळ त्याला त्याचप्रमाणे भेटतील".
आपल्या प्रपंचाची घडी व्यवस्थित ठेऊन आजूबाजूच्या गरिबांकडे लक्ष देऊन त्यांना मदत केली, जकात सदकाह व फितत्राह यांचा गरजू, पीडित, बेसहारा ,अनाथ ,विधवा यांना देऊन , दानधर्म देऊन एक सामाजिक बांधिलकी योगदान, कार्य केले हे सर्व करताना प्रत्येक क्षणी ईश्वराचे भान ठेवले आपल्या हातून कळत नकळत काही चूक तर झाली नाही ना हे क्षनोक्षनी आठवण ठेवत हे कार्य केले .मदत करून आपण एक भारतीय बांधव आहोत . आपण सर्व भाई भाई आहोत असे मनापासून भावना व्यक्त करुन साथ दिली. पहाटे पासून.ते संध्याकाळ पर्यंत जेवढे काही करता आले तेवढी समाज सेवा ही ईश्वर सेवा आहे हे तन-मन-धनाने सर्व जगामध्ये आदराने व मनाने करून सर्व जगाला आपण कोणत्याही लोभाची,अपेक्षाची ईच्छा नसतानाही केली, कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता प्रेषीत.मोहम्मद सल्ल. च्या शिकवणीतून आपल्या आचरणाने कर्तव्य पार पाडले व भारतामधील मुस्लिम विरोधी मीडिया मुसलमानांविरुद्ध आग ओकत असताना व मुसलमानांना बदनामी करत असताना , कोणताही प्रतिकार न करता , शांत ,सहन करत ,सामाजिक शातंता भंग पावणार नाही याची दक्षता घेत , हणोक्षणी आपल्या प्रत्येक कृतीतून दाखवून दिलं ."
इस्लाम आदर और अपनापन का नाम है " डोळ्यांनी जगाने पाहिलेच असणार, प्रत्येक मुसलमान बंधू बाराही महिने करीत असतो , मुसलमान जीवन पद्धती आहेत , मुसलमान असाच असतो , व्यवहारातून आचरणातून सर्व जगाने बघितले.
आज ईद उल फित्र चा बक्षीस ईनाम प्राप्तीचा दिवस आहे, अल्लाहा बक्षीस देणारच , कोणाला किती किती तेच ठरवणारे आहेत .
प्रेषीत मुहम्मद स्व. म्हणतात " अल्लाह ( भगवंत )आपल्याला ७० आई पेक्षा ही जास्त प्रेम करतो ,'"
आई लेकराला एवढे प्रेम करीत असेल तर , तो अल्लाहा आहे हो, " अल्लाहा जीवसृष्टीच्या प्रत्येक जीवजंतू वर आई सारखेच प्रेम करतात.
संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात,
"अल्ला देवे अल्ला दिलावे। अल्ला दारु अल्ला खिलावे।
अल्ला बगर नहीं कोय अल्ला करे सोहि होय ॥१॥
मर्द होये वो खडा फीर। नामर्दकुं नहीं धीर । आपने दिलकुं करना खुसी तीन दामकी क्या खुमासी ॥२॥
सब रसों का किया मार। भजनगोली एक हि सार ।
इमान तो सब ही सखा। थोडी तो भी लेकर ज्या ॥ ३॥
जिन्हो पास नीत सोये। वोहि बसकर तिरोवे ।
सांतो पांचो मार चलावे । उतार सो पीछे खावे ॥४॥
सब ज्वानी निकल जावे। पीछे गधडा मटी खावे । गांवढाळ सो क्या लेवे। हगवनी भरी नहि धोवे ॥५॥
मेरी दारु जिन्हें खाया। दिदार दरगां सोहि पाया ।
तल्हे मुंढी घाल जावे। बिगारी सोवे क्या लेवे ॥६॥
बजारका बुझे भाव। वो हि पुसता आवे ठाव ।
फुकट बाटु कहे तुका । लेवे सोहि लें हिसखा ॥७॥
याचा अर्थ अर्थ काय तर तुकोबा म्हणतात...
अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारु अल्ला खिलावे। अल्ला बगर नही कोय अल्ला करे सोहि होय ॥१॥
"रे माणसा, अल्लाच देतो, अल्लाच देववतो. अल्लाच दवादारू पाजतो आणि खाऊही घालतो. अल्लाशिवाय जगात कोणीही नाही. अल्ला करेल तेच होते, असे सतत म्हणतोस ना? मग आता काय सांगतो ते ऐक!"
मर्द होये वो खडा फीर नामर्दकुं नहीं धीर । आपने दिलकुं करना खुसी तीन दामकी क्या खुमासी ॥२ ॥
"अरे, ह्या दारूने तुला धड उभेही रहाता येत नाही. जो मर्द असतो तोच ताठ उभा रहातो, हे विसरलास काय? नामर्दाला ते जमत नाही हे तुला ठाऊक नाही काय? केवळ दिल खुश व्हावे म्हणून नशा करून हा तीन पैशाचा काय तमाशा लावलायसं तू?"
सब रसोंका किया मार। भजनगोली एक हि सार ।
इमान तो सब ही सखा । थोडी तो भी लेकर ज्या ॥ ३॥
"अरे भल्या माणसा, तुला रसपानच करायचे आहे ना? मग सर्व रसांचा रस, रससार असे हरीभजन तू कर... तुझ्या अंतरात्म्यात थोडेसे जरी इमान शिल्लक असेल तर माझ्या मित्रा, थोडेसे तरी भजन करून बघ !"
जिन्हो पास नीत सोये। वोहि बसकर तिरोवे।
सांतो पांचो मार चलावे । उतार सो पीछे खावे ॥४॥
"जवानीने मदमस्त झाला आहेस तू, भ्रमिष्टा बनला आहेस, पण लक्षात ठेव, ज्याने नीतीला झोपविले, आणि अनीतीने वागत राहिला, त्याला कर्माचे फळ, त्याच्या पापाचे फळ चुकलेले नाही. त्याला सारे काही भोगावेच लागते. जवानीत करशील मस्ती, अन उतारवयात पाठीमागून लाथा खाशील!"
सब ज्वानी निकल जावे। पीछे गधडा मटी खावे । गांवढाळ सो क्या लेवे। हगवनी भरी नहि धोवे ॥५॥
"अरे मूर्ख...! ही सारी जवानी निघून जाईल आणि मग गधड्या माती खाशील! अरे गावंढळ माणसा, म्हातारपणी तुझी हगवण धुवायलाही कुणी भेटाचये नाही रे.... अशी अवस्था होईल ह्या दारूपायी!"
मेरी दारु जिन्हें खाया। दिदार दरगां सोहि पाया ।
तल्हे मुंढी घाल जावे। बिगारी सोवे क्या लेवे ॥६॥
"ये, भाबड्या जीवा, ये... माझी हरीभजनाची दारू जो पिईल, ती ईश्वर भक्तीची नशा चाखेल तोच दर्याचा खरा दीदार होईल. तोच खरा ईश्वराच्या जवळ जाईल. तोच ईश्वराच्या प्रेमाला पात्र राहील.... जगाच्या वासनेची दारू पिऊन खाली मुंडी घालून किती चालत राहाशील रे? अरे, बिगारी कामगार जर झोपून राहिला तर तो छदाम तरी कमावेल का?"
बजारका बुझे भाव। वो हि पुसता आवे ठाव । फुकट बाटु कहे तुका । लेवे सोहि लें हिसखा ॥७॥
"पण तेच तू करतो आहेस, अशाने बाजार बुडेल. तुला कोणी विचारणार नाही. तू काहीच प्रयत्न नाही केलेस तर तुला देव काय फुकटात भेटणार आहे काय?"
* *ईद-उल-फित्र च्या रमजान ईद*च्या खूप खूप शुभेच्छा*...
लेखक डॉ. सलीम शाईदा सिकंदर शेख.
बैतुशशिफा मल्टिस्पेशालिटी दवाखाना,
श्रीरामपूर.
९२७१६४००१४,





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा