Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १५ मार्च, २०२६

रमजानुल मुबारक -२६* *सत्ताविसावी शबच शबे कद्र नव्हे*

 सलीमखान पठाण*

  *श्रीरामपूर*

*९२२६४०८०८२*



रहमत,मगफिरत व बरकत चा महिना रमजान महिन्यात महत्वपूर्ण असणारी शबे कद्र आज रात्री साजरी होत आहे.महिनाभर सर्व मशिदीतून तरावीहच्या नमाज मध्ये पठन झालेल्या कुरआन शरीफचे पठन आज पूर्ण होणार आहे.प्रेषित हजरत पैगंबरांनी कयामतची जी लक्षणे नमूद केली आहेत त्यात एक असे ही म्हटले आहे कि दिवसांची बरकत निघून जाईल.साल महिन्यासमान,महिने आठवडयासमान,आठवडे दिवसा समान व दिवस तासा समान निघून जातील त्याचा प्रत्यय आपण घेतच आहोत.


शबे कद्र ही रमजानच्या शेवटच्या चरणातील जे पाच रात्री आहेत त्यामध्ये गुप्त ठेवण्यात आलेली आहे. २१,२३,२५,२७ व २९ या पाच रात्रींपैकी एक रात्र ही शबे कद्र आहे.कुरआन शरीफ चे पठण करताना त्याची सांगता २७ व्या रात्री  करण्याचा प्रघात आपल्याकडे आहे.ती २९ तारखेला देखील करता येऊ शकते.चाली रीती,परंपरा पाळताना आवश्यकतेनुसार काळानुरूप त्यामध्ये बदल केला पाहिजे. सत्तावीसावी शब म्हणजेच शबे कद्र ही धारणा योग्य नाही. २९वी रात्र देखील शबे कद्र असू शकते हे ध्यानात ठेवावे.


इस्लामी शरियतनुसार शादी किंवा लग्न हा एक प्रकारचा करारनामा असून त्यात काजी,वकिल,दोन साक्षीदार हे या प्रक्रियेचे अंग आहे. लग्न जमविण्यापूर्वी मुलामुलीची पसंती हा लग्नाचा अविभाज्य भाग आहे.निकाह लावण्यापूर्वी वकिल जो मुलीकडून निवडला जातो तो दोन साक्षीदारा समक्ष मुलीची भेट घेतो व या लग्नाला तिची संमती (इजाजत) आहे किंवा नाही हे विचारतो.संमती नसल्यास निकाह होत नाही.


समाजात अनेक कारणांनी पती पत्नीचे घटस्फोट होत असतात.जेव्हा पती पत्नी म्हणून संसार करणे अशक्य होऊन जाते तेव्हा घटस्फोटाचा मार्ग स्विकारला जातो.पण त्यासाठीची प्रक्रिया क्लिष्ट स्वरुपाची आहे.न्यायालयात दिल्या जाणाऱ्या घटस्फोटात स्त्रीच्या अब्रूचे धिंडवडे काढले जातात. शिवाय घटस्फोट झाला तरी स्त्रीला दुसरे लग्न करता येत नाही किंवा समाजात तिला अनेक समस्यांना तोंड दयावे लागते. अनेक गिधाडे वासनाधिन भावनेने अशा स्त्रीयांकडे पाहतात किंवा वागतात.पण इस्लामी शरियतनुसार अशा प्रथांना थारा नाही.ज्यावेळी विवाह संबंध टिकविणे किंवा निभाव करणे अशक्य होऊन जाते तेव्हाच तलाकचा मार्ग अनुसरण्याची अनुमती आहे. ज्या सहजतेने निकाह केला जातो त्याच सहजतेने दोन साक्षीदारांसमक्ष तलाक देऊन विवाह संबंध संपुष्टात येतात.त्यामुळे नवऱ्याविरुध्द खोटया केसेस किंवा ४९८ सारखे प्रकार न होता दोन्ही पक्ष स्वतंत्र घरोबा करण्यास पात्र ठरतात.ज्या स्त्रीचा तलाक झाला आहे तिला घरात बसून न ठेवता शक्य तितक्या लवकर तिचे दुसरे लग्न करुन देण्याची शिकवण शरियत मध्ये दिली आहे  म्हणजे तिच्या जीवनाची हेळसांड होणार नाही याची काळजी घेतली गेली आहे. इस्लाम ने स्त्रीचा सर्वाधिक सन्मान केला आहे.स्त्री विधवा झाल्यास तिला सती जावे लागत नाही,पांढरे कपडे परिधान करावे लागत नाही,केशवपन केले जात नाही,कुल्टा समजले जात नाही,ज्या स्त्रीचा घटस्फोट होतो किंवा वैधव्य प्राप्त होते, तिच्या व्यथा ही ती व तिच्या कुटुंबालाच माहिती असतात. या यातनातून तिची सुटका करण्याचा मार्ग इस्लामने दाखविला आहे,यासाठी तलाक व निकाह या मागील भूमिका समजून घेणे आवश्यक आहे.तलाक पिडीतांना सहानुभूती दाखविणाऱ्या सरकारने इतर समाजातील काही कोटींच्या संख्येत असलेल्या विधवा व घटस्फोटित भगिनींचाही विचार करणे आवश्यक आहे.शेवटी समाजात हा एक ज्वलंत प्रश्न आहे.विवाह किंवा घटस्फोट हा प्रत्येक समाजासाठी महत्वाचा प्रश्न आहे.(क्रमशः)


*सलीमखान पठाण*

  *श्रीरामपूर*

*९२२६४०८०८२*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा