*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
*गावखेड्यांना देण्यात येणारी सावत्र वागणूक, सरपंचांना फक्त जाहीर असलेले मात्र नियमित न मिळणारे तोडके मानधन*, *ग्रामसेवकांना अनियमिततेच्या नावाखाली नाहक फौजदारी* *कचाट्यात अडकवणे,संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा न देता खाजगी कंपनीच्या घशात* *दरसाल कोट्यावधी रुपये घालण्याचे चाललेले बेकायदा काम*,*ग्राम रोजगार सेवकांना दुर्लक्षित करणे,ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्ता लागू न करणे अशा मागण्या* *वारंवार मान्य असून सुद्धा शासन गावखेड्यांना दुर्लक्षित करीत आहे.गावगाड्याचा कारभार चालवणाऱ्या या सर्व प्रमुख* *घटकांच्या अपेक्षा पूर्ण करा अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल,असा इशारा* *
*गावखेड्यांच्या अपेक्षा मोर्चाच्या*
*सहविचार व पूर्वतयारीच्या राज्यस्तरीय बैठकीतून देण्यात आला*
*अखिल भारतीय सरपंच *परिषदेच्या पुढाकाराने*
*पुण्यातील पाषाण रोड* *भागातील सीपीआर इन्स्टिट्युट सभागृहात सरपंच,ग्रामसेवक*,
*संगणक परिचालक,ग्राम रोजगार सेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी या सर्व* *राज्यस्तरीय संघटनांची संयुक्त बैठक शनिवारी (18 नोव्हें.) झाली.अखिल भारतीय सरपंच परिषदेचे* *संस्थापक प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या संकल्पनेतून राज्यभरातील ग्रामपंचायतींना आणि ग्रामविकासाचा गाडा चालवणाऱ्या प्रमुख घटकांना* *एकत्र करून लढा उभारण्यासाठी ही विचारविनिमयाची बैठक होती. या बैठकीत ग्रामपंचायत* *चालवणाऱ्या या सर्व घटकांच्या संघटनांची एकत्रित मोट बांधण्याचा व यापुढे सर्वांच्या प्रलंबित मागाण्यांसाठी समान कृती कार्यक्रम तयार करून एकत्रित लढा उभारण्याचे धोरण जाहीर करण्यात आले*.
*सरपंच परिषदेचे जयंतराव पाटील,ग्रामसेवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजीव निकम, संगणक परिचालक संघटनेचे* *प्रदेशाध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे,ग्राम रोजगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विनोद चव्हाण,सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस विवेक* *ठाकरे,कोअर कमिटीचे पुरुजीत चौधरी,प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत मोरे,महिला उपाध्यक्षा* . *रेखा विद्याधर टापरे,प्रदेश सल्लागार प्रा. राजेंद्र कराडे आदी प्रमुख उपस्थित होते*.
*ग्रामपंचायती कामं बंद आंदोलन उभारणार :*
*ग्रामपंचायत कारभारात भूमिका असणाऱ्या सर्व प्रमुख घटकांना एकत्र करत शासनाकडे वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्यांकडे मुद्दाम दुर्लक्ष* *होत असल्याने येत्या पंधरवाड्यात राज्य शासनाच्या* *ग्रामविकास विभागाकडे मागणी करण्यात येईल याबाबत शासनाने *तात्काळ धोरण न *ठरवल्यास*
डिसेंबर* *महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यभरातील* *ग्रामपंचायती काम बंद आंदोलन उभारतील असा निर्धार सर्वानुमते करण्यात आला*.
*दरम्यान, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या काळात सरपंच*,*उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक,ग्राम रोजगार सेवक,संगणक परिचालक व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या सर्वांचा सुमारे तीन लाखाचा मोर्चा मुंबई मंत्रालयावर काढण्याचे सुद्धा ठरले*.
*बैठकीचे प्रास्ताविक प्रदीप माने यांनी केले.आभार जळगाव जिल्हाध्यक्ष वासुदेव नरवाडे यांनी मानले*.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा