Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ६ जून, २०२४

*केंद्रात तिसऱ्यांदा पुन्हा मोदी सरकार ---चंद्राबाबू नायडू, नितेश कुमार, यांनी भाजपला सोपवली समर्थन पत्रे*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

नवी दिल्ली :- नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू इंडिया आघाडीत जाण्याची चर्चा सुरू होती, पण आता अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. भाजपला समर्थन पत्रे देण्याचा अर्थ, त्यांनी एनडीए सरकारला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.

      लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत गाठता आले नाही, पण मित्रपक्षांच्या मदतीने त्यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे आता दिल्लीत सरकार स्थापनेच्या हालचालींनाही वेग आला आहे. नुकतीच दिल्लीत एनडीएची बैठक संपली, यात नरेंद्र मोदी यांना संसदीय दलाचा नेता म्हणून निवडण्यात आले. या बैठकीत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी भाजपला समर्थनाची पत्रे दिली आहेत. म्हणजेच, नितीश आणि चंद्राबाबू यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम लागला आहे.

      आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची भेट घेऊन आपला राजीनामा सुपूर्द केला. तसेच, लोकसभा भंग करण्याची विनंती केली. यानंतर सायंकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी NDA ची तासाभरात बैठक झाली. या बैठकीत नितीश आणि चंद्राबाबू यांच्यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पवन कल्याण, जयंत चौधरी, जीतन राम मांझी, चिराग पासवान, अनुप्रिया पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

      या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमताचा जादुई आकडा पार करता आला नाही. त्यामुळेच आता त्यांना मित्रपक्षांची गरज लागणार आहे. विशेष म्हणजे, जेडीयूचे नितीश कुमार आणि टीडीपीचे एन चंद्राबाबू नायडू एनडीए सरकार स्थापन करण्यात किंगमेकरची भूमिका बजावत आहेत. या निवडणुकीत भाजपने २४० जागा जिंकल्या, ज्या बहुमताच्या आकड्यापेक्षा ३२ ने कमी आहे. तर, टीडीपी आणि जेडीयूकडे एकूण २८ जागा आहेत. भाजपच्या इतर मित्रपक्षांसोबत मिळून एनडीए बहुमताचा आकडा पार करेल.

        या बैठकीनंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील नरेंद्र मोदी यांना समर्थन असल्याचे जाहीर केले. सोशल मीडियावर पोस्ट करताना शिंदेंनी लिहिले की, 'लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीची आज दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत नरेंद्र मोदीजी यांचे या विजयाबद्दल अभिनंदन करून त्यांना पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. नितीशकुमार यांच्या जनता दल युनायटेड, चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देसम प्रमाणेच शिवसेनेनेही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी तयार असल्याचे सांगत जाहीर पाठींबा दिला,' असे ते म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा